छोरी भी छोरों से कम नहीं…!
महाविद्यालयांत हाणामारीचे प्रकार वाढले
नाशिक ः प्रतिनिधी
मुलगी शिकली प्रगती झाली. याबाबत बोलताना छोरी भी छोरोंसे कम नही, हा दंगल चित्रपटातील संवाद मुलींचे कौतुक करण्यासाठी अभिमानाने उच्चारला जात असत. परंतु गेल्या काही दिवसांत महाविद्यालयीन तरुणींचे सोशल मीडियावर जे काही हाणामारीचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत ते पाहता महाविद्यालयात एकेकाळी विद्यालयाचे आवार विद्यार्थ्यांच्या हाणामारीने गाजायचे. आता गेल्या काही दिवसांच्या घटना पाहता विद्यार्थिनीही हाणामारीत मागे नसल्याने छोरी भी छोरोंसे कम नही, असे उपरोधिकपणे म्हणण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये महाविद्यालयात मुलींमध्येच भांडणे होण्याचे प्रमाण वाढले आहेत. थेट फायटरसारख्या हत्याराचा वापर करीत लाथाबुक्यांसह झिंज्या उपटण्यापर्यंत मारामारीच्या घटनाही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलींमध्ये हिंसकपणा वाढीस लागण्याचे कारण मोबाइल,बॉयफ्रेन्ड एकमेकींबद्दल गैरसमज निर्माण करणे हे असल्याचे आतापर्यंत तीन ठिकाणच्या फ्रीस्टाइल मारामारीत समोर आले आहेत. विशेष म्हणजे हाणामारी सोडविण्याऐवजी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात चढाओढ दिसून आली. एखाद्या मुलाने मुलींची छेड काढल्यास मुलाला यथेच्छ चोप देणार्या घटनाही घडतात. एकमेकांची मैत्री, प्रेम आदी कारणांहून मुलामुलांच्या हाणामार्या होतात.परंतु मुलीमुलींचीही याच कारणांहून भांडणे होत असल्याने चर्चेचा विषय बनत आहे. लहान मुलांची लुटुपटूची भांडणे खेळतांना अनेकदा होतात. पुन्हा विसरून एकत्र येतात. महिलांची भांडणे नवी नाहीत. नळावरील भांडणे सर्वाना परिचीत आहेत. परंतु मुलीही आता भांडणात अग्रेसर होत आहे.आपला मित्र,बॉयफ्रेन्ड यांतील मैत्री प्रेम यासह एकमेकांबद्दल अफवा, गैरसमज आदी कारणांमुळे मुलांप्रमाणे मुलींमुलींचेही भांडणे विकोपाला जात असल्याचे चित्र आहे.
नाशिक ः प्रतिनिधी
मुलगी शिकली प्रगती झाली. याबाबत बोलताना छोरी भी छोरोंसे कम नही, हा दंगल चित्रपटातील संवाद मुलींचे कौतुक करण्यासाठी अभिमानाने उच्चारला जात असत. परंतु गेल्या काही दिवसांत महाविद्यालयीन तरुणींचे सोशल मीडियावर जे काही हाणामारीचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत ते पाहता महाविद्यालयात एकेकाळी विद्यालयाचे आवार विद्यार्थ्यांच्या हाणामारीने गाजायचे. आता गेल्या काही दिवसांच्या घटना पाहता विद्यार्थिनीही हाणामारीत मागे नसल्याने छोरी भी छोरोंसे कम नही, असे उपरोधिकपणे म्हणण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये महाविद्यालयात मुलींमध्येच भांडणे होण्याचे प्रमाण वाढले आहेत. थेट फायटरसारख्या हत्याराचा वापर करीत लाथाबुक्यांसह झिंज्या उपटण्यापर्यंत मारामारीच्या घटनाही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलींमध्ये हिंसकपणा वाढीस लागण्याचे कारण मोबाइल,बॉयफ्रेन्ड एकमेकींबद्दल गैरसमज निर्माण करणे हे असल्याचे आतापर्यंत तीन ठिकाणच्या फ्रीस्टाइल मारामारीत समोर आले आहेत. विशेष म्हणजे हाणामारी सोडविण्याऐवजी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात चढाओढ दिसून आली. एखाद्या मुलाने मुलींची छेड काढल्यास मुलाला यथेच्छ चोप देणार्या घटनाही घडतात. एकमेकांची मैत्री, प्रेम आदी कारणांहून मुलामुलांच्या हाणामार्या होतात.परंतु मुलीमुलींचीही याच कारणांहून भांडणे होत असल्याने चर्चेचा विषय बनत आहे. लहान मुलांची लुटुपटूची भांडणे खेळतांना अनेकदा होतात. पुन्हा विसरून एकत्र येतात. महिलांची भांडणे नवी नाहीत. नळावरील भांडणे सर्वाना परिचीत आहेत. परंतु मुलीही आता भांडणात अग्रेसर होत आहे.आपला मित्र,बॉयफ्रेन्ड यांतील मैत्री प्रेम यासह एकमेकांबद्दल अफवा, गैरसमज आदी कारणांमुळे मुलांप्रमाणे मुलींमुलींचेही भांडणे विकोपाला जात असल्याचे चित्र आहे.
पालकांनी सजग व्हावे
शाळेतील शिस्तबद्ध जीवनातून आयुष्याला कलाटणी देणार्या करीअर घडविण्याच्या काळास महाविद्यालयीन जीवनात सुरूवात होत असते.परंतु कळत न कळत आर्कषण, प्रेम निर्माण होणे या हार्मोन्स बदलाला तरुणाईला सामोरे जातांना अवघड जाते. मैत्री, प्रेम या गोष्टींकडे आर्कषिले जातात. परिणामी मुलींचे गट, चर्चा यातून एकमेकंीबद्दल समज गैरसमज, अङ्गवा यातून भावना मारामारीच्या रुपाने व्यक्त केल्या जात असल्याने पालकांनीही आता सजग होण्याची गरज निर्माण झाली आहे.
शाळेतील शिस्तबद्ध जीवनातून आयुष्याला कलाटणी देणार्या करीअर घडविण्याच्या काळास महाविद्यालयीन जीवनात सुरूवात होत असते.परंतु कळत न कळत आर्कषण, प्रेम निर्माण होणे या हार्मोन्स बदलाला तरुणाईला सामोरे जातांना अवघड जाते. मैत्री, प्रेम या गोष्टींकडे आर्कषिले जातात. परिणामी मुलींचे गट, चर्चा यातून एकमेकंीबद्दल समज गैरसमज, अङ्गवा यातून भावना मारामारीच्या रुपाने व्यक्त केल्या जात असल्याने पालकांनीही आता सजग होण्याची गरज निर्माण झाली आहे.
आक्रमकता आणि हिंसाचार गेल्या काही वर्षात वाढत आहे, विशेषतः तरुण वर्गात. नैसर्गिक हॉर्मोनल बदलांव्यतिरिक्त्त टीव्ही मोबाइलचा अतिवापर, इंटरनेट च्या आभासी जगात जास्त वावरणे, वाढती व्यसने, सोशल मीडिया वर आधारित ठिसूळ प्रेमप्रकरणे अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. प्रेम आकर्षण या भावना या वयात नैसर्गिक असल्या तरी भावनांच्या आहारी न जाता कॉलेजेस मध्ये अभ्यास करियर या मुख्य लक्ष्यावर भर देणे हे खरे आव्हान आहे. सोशल मीडिया च्या आणि मनोरंजनासाठी इंटरनेटच्या वापरावर नियंत्रण गरजेचे आहे. उज्ज्वल भविष्यासाठी आज भावनिक उद्रेकावर नियंत्रण जमले पाहिजे.
-डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञकॉलेजेसमध्ये मुलींचे वाद होणे नवीन नाही. सोशल मीडियामुळे नजरेत येत आहेत.पूर्वीही महिलांचे पाण्यावरून वाद होत असे.त्यामुळे मुलीमुलींचे वाद नवीन नाहीत.पालकांनी मुलांशी संवाद साधून अडचणी जाणून घ्याव्यात.
– पौर्णिमा चौघुले,
पोलीस उपायुक्त