उत्तर महाराष्ट्र

दोन वर्षानंतर गोदावरी एक्स्प्रेस लासलगाव स्थानकात दाखल

दोन वर्षानंतर गोदावरी एक्स्प्रेस लासलगाव स्थानकात दाखल

लासलगाव प्रतिनिधी

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या शिष्टाईला यश आले असून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव,मनमाड,निफाड तसेच जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गोदावरी एक्स्प्रेस प्रयोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी सुरू झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.कोराना काळात रेल्वे प्रवासी,सरकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात होत असलेली गैरसोय विचारात घेता प्रवाश्यांच्या मागणीची दखल घेऊन ना.डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेऊन रेल्वेसेवेची मागणी केली होती.

ना.डॉ.भारती पवार यांच्या प्रयत्नांनी गोदावरी एक्सप्रेस सोमवारी सकाळी ११-१५ वा लासलगाव रेल्वे स्थानकात आली.यावेळी लासलगाव जि.प सदस्य ङी के जगताप,बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी डॉ.भारती पवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून गोदावरी एक्सप्रेसचे स्वागत केले.यावेळी बुकिंग ऑफिसर जोशी,राजाभाऊ चाफेकर,स्मिता कुलकर्णी,ज्योती शिंदे,शैलजा भावसार,रंजना शिंदे,बापू लचके,नितीन शर्मा सह लासलगाव प्रवासी संघटने सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा मागणी केल्यानंतर तब्बल पावणे दोन वर्षानंतर गोदावरी एक्सप्रेस प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी सुरु करण्यात अली आहे.कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून रेल्वे प्रशासनाने मार्च २०२० मध्ये भुसावळ विभागातून धावणाऱ्या सर्व गाड्या बंद केल्या होत्या.टप्प्याटप्प्याने या रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत असून गोदावरी एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे.

Bhagwat Udavant

View Comments

Recent Posts

महापालिकेला एक लाख वृक्ष लागवडीचे टार्गेट

प्रधान सचिवांची ऑनलाइन आढावा बैठकीत सूचना नाशिक : प्रतिनिधी शहरात पन्नास लाखांची वनसंपदा असल्याचे सहा…

10 hours ago

48 सोनोग्राफी केंद्रांची झाडाझडती

भरारी पथकांकडून शहरात धडक मोहीम नाशिक : प्रतिनिधी शहरातील गंगापूर रोडवरील पंड्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदानाचा…

10 hours ago

बत्तीस कोटींचे यांत्रिकी झाडू पावसाळ्यात फेल

वर्षभरात 55 हजार किमी रस्ते सफाईचा दावा; आता चार महिने बंद नाशिक ः प्रतिनिधी गुजरातमधील…

11 hours ago

मुलींनो, खंबीर व्हा..

प्रत्येक मुलीचे जीवनातील महत्त्वाचा क्षण म्हणजे, ज्यावेळी ती सासरी जाते. ज्या घरात ती वावरली, हसली,…

11 hours ago

रागावर नियंत्रण हीच आत्मविकासाची पहिली पायरी

राग ही माणसाच्या मनाची एक सहज आणि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. प्रत्येकालाच राग येतो. कारण सगळं…

11 hours ago

हुंडा की संस्कारांची शिदोरी?

आपलंच खाऊन आपल्याच जीवावर मोठे होणारे एक दिवस आपल्यालाच संपवायला मागे-पुढे बघत नाहीत. म्हणून नेहमी…

11 hours ago