लासलगाव प्रतिनिधी
बेकायदेशीर कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणाऱ्या पीक अप गाडीला गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे मालेगाव ग्रामीण पोलीसांनी पकडल्याने ०८ गोवंशीय जनावरांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले असल्याची माहिती संतोष केंदळे लासलगाव,बजरंग दल विशेष संपर्कप्रमुख नाशिक जिल्हा यांनी दिली आहे.या प्रकरणी मालेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार उमराणे गावाकडून मालेगाव शहराकडे कडे ०८ गोवंश जनावरे पीक अप गाडीतून घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गोरक्षकाना मिळाली होती.यावरून गोरक्षक मच्छिंद्र शिर्के,विलास जगताप,गोसावी महाराज आणि इतर गोरक्षक गाडी अडवण्यासाठी उमराणा फाट्यावर उभे असता सदर पीक अप गाडी त्याठिकाणी आल्यानंतर या सर्व गोरक्षकानी गाडीचा पाठलाग केला व मुंगसे गावाजवळ सदर गाडी पकडण्यात गोराक्षकाना यश मिळाले.
गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांनी याबाबत ची माहिती मालेगाव ग्रामीण पोलिसांना कळवली असता पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व पीक अप गाडी चालकासह ०८ गोवंश जनावरे ताब्यात घेतली.या प्रकरणी मालेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…
अॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…
पिंपळगावच्या व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याची तब्बल 15…