लासलगाव प्रतिनिधी
बेकायदेशीर कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणाऱ्या पीक अप गाडीला गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे मालेगाव ग्रामीण पोलीसांनी पकडल्याने ०८ गोवंशीय जनावरांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले असल्याची माहिती संतोष केंदळे लासलगाव,बजरंग दल विशेष संपर्कप्रमुख नाशिक जिल्हा यांनी दिली आहे.या प्रकरणी मालेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार उमराणे गावाकडून मालेगाव शहराकडे कडे ०८ गोवंश जनावरे पीक अप गाडीतून घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गोरक्षकाना मिळाली होती.यावरून गोरक्षक मच्छिंद्र शिर्के,विलास जगताप,गोसावी महाराज आणि इतर गोरक्षक गाडी अडवण्यासाठी उमराणा फाट्यावर उभे असता सदर पीक अप गाडी त्याठिकाणी आल्यानंतर या सर्व गोरक्षकानी गाडीचा पाठलाग केला व मुंगसे गावाजवळ सदर गाडी पकडण्यात गोराक्षकाना यश मिळाले.
गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांनी याबाबत ची माहिती मालेगाव ग्रामीण पोलिसांना कळवली असता पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व पीक अप गाडी चालकासह ०८ गोवंश जनावरे ताब्यात घेतली.या प्रकरणी मालेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…