गुन्हेगारी वाढण्यास सरकार जबाबदार

 

शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचा आरोप

नाशिकः
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गृह, वित्त सारख्या अनेक महत्वाची आणि अर्थपूर्ण खाती त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजप मध्ये दुसरा कोणी आमदार, कार्यक्षम नाही की फडणवीस यांनाच सत्तेचा मलिदा खायचा आहे? असा सवाल शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी करत आता तरी नाशिकसह राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी फडणवीस यांनी स्वत्तंत्र गृहमंत्री द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

शिवसेना प्रवकत्या सुषमा अंधारे यांची कृषीथॉन प्रदर्शनापूर्वी शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आजचा दौरा अनौपचारिक आहे . नाशिक जिल्ह्यात महा प्रबोधन सभा त्यासाठी येणार आहे १६ ते १८ डिसेंबर रोजी येणार आहे. मी कोणावरही आरोप करत नाही, टीका करत नाही .कुटुंबात काय चुकलं हे विचारण्याचा बहीण म्हणून अधिकार आहे. भाऊ किती उर्मट झाले हे माध्यमे बघत आहे. भाजपच्या वळचणीला गेल्या नंतर त्यांचे संस्कार हिन झाले आहे. गुलाब राव पाटील यांचा माज तसेच अब्दुल सत्तार यांची भाषा बदलली. किरीट सोमय्या यांनी कागदपत्रे काढून काहीच मिळत नाहीये. त्यामुळे सोमय्या यांना एखादं मंत्री पद द्यावे असेही
अंधारे यांनी सांगितले. यावेळी उपनेते सुनिल बागुल, दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते.

राणे यांच्यावर टीका

मी  कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने राणे कुटुंब अस्वस्थ झाले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुलांना चांगले संस्कार दिले नसल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. त्यामुळेच आपला नीतू आणि नीलू प्रचंड आघाऊ झाले आहेत. त्यांना आता तरी राणे यांनी काही वेळ काढून शिकवण द्यावी असेही आवाहनही अंधारे यांनी केला.

एकीकडे महिलांना फक्त धक्का लागल्याने गुन्हा दाखल होतो. तर दुसरीकडे नाशिकमध्ये मुलींवर अत्याचार होऊनही राज्य शासन ठोस कारवाई करत नाही. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्र आज कोणत्या वळणावर चालला आहे याचा जनतेनेच विचार करावा असे ही अंधारे म्हणाल्या.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago