नाशिक

अतिवृष्टी, खराब हवामानाचा भाजीपाल्याला फटका

शेतकरी हवालदिल;भाजीपाला शंभरी पार

मनमाड : प्रतिनिधी
काही भागात झालेली अतिवृष्टी, खराब हवामान तसेच सध्या सुरू असलेला पितरपाठ यामुळे छोट्यापासून मोठ्या शहरापर्यंत भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झाली असल्याचे चित्र आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसपाठोपाठ आता भाजीपालादेखील महाग झाला आहे. सर्वच भाजीपाल्याने प्रतिकिलो शंभरी गाठली आहे. मांस, मच्छी, मटण, तेल, डाळी यांचे भावदेखील मोठ्या प्रमाणात वधारले आहेत.
याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, त्यांचे बजट कोलमडले तर दुसरीकडे दोन महिन्यांपूर्वी भाजीपाल्याचे दर इतके कोसळले होते की, ते फेकून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली होती. आता शेतकर्‍यांच्या मालाला भाव चांगला मिळतोय, मात्र बदलत्या हवामानाचा फटका पिकांना बसून उत्पादनात घट झाल्याने भाववाढ होऊनदेखील शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच आहे.
सध्या देशभरात महागाईचा आगडोंब उठला आहेे. पेट्रोल आणि डिझेलने शंभरी पार केली असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ही मोठी वाढ झाली आहे. मटणाचे भाव प्रतिकिलो 800 रुपये तर कोंबडीच्या मटणाचे भावदेखील प्रतिकिलो 200 रुपयांच्या उंबरठ्यावर आले आहे. वाढत्या महागाईचा सर्वांत जास्त फटका हा गोरगरीब, मजूर आणि रोज कमवून खाणार्‍यांना बसत आहे असून, जितक्या वेगाने महागाई वाढत आहे तेवढ्या वेगाने कमाई वाढत नसल्यामुळे अनेकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. गोरगरीब व मजुरापासून मध्यम वर्गीयांपर्यंत भाजीपाला एकमेव स्वस्त होता, मात्र इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसोबत आता भाजीपालादेखील महागला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे त्याचा फटका इतर पिकांसोबत भाजीपाल्याला बसला आहे. त्यामुळे आवक कमी तर मागणी जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे भावात वाढ झाली असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊनदेखील उत्पादनात घट झाल्यामुळे खर्चदेखील निघत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

 

Editorial Team

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

10 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago