प.पू. आचार्य भगवंत पुण्यपाल सुरींश्वर महाराज यांचे महानिर्वाण

प.पू. आचार्य भगवंत पुण्यपाल सुरींचे महानिर्वाण
नाशिक | जैन धर्मियांचे विद्यमान गच्छाधीपती संघनायक व सुमारे २००० साधुसंताचे मुख्य प.पू. आचार्य भगवंत श्रीमद‌् विजय पुण्यपाल सुरीश्वरजी (७८) यांचे अल्पकालीन आजाराने मुलंड (मुंबई) वेस्ट विनानगर संघ उपाश्रयमध्ये महानिर्वाण झाले. नवकार महामंत्राचे स्मरण करता करता आज सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ७० वर्षापूर्वी वयाच्या ८ व्या वर्षी वणी जि. नाशिक येथे जैन धर्म शास्त्राप्रमाणे त्यांनी बालदीक्षा घेतली व अत्यंत अभ्यासपूर्ण अवस्थेत शास्त्रशुद्ध आचारण करून नावलाैकिक वाढविला. त्यांचे वडील आचार्य सुविशाल वात्सल्य निधी प.पू. आ.भ. महाबळ सुरीश्वरजी महाराज व आई जैन साध्वी प.पू. विमल किर्तीश्रीजी या दाेघांनी देखील दीक्षा घेतली व त्यांचे महानिर्वाण झाले. त्यांचे वणी नाशिक येथील चातुर्मास देखील गाजले व अलीकडेच नाशिक येथे प्राणप्रतिष्ठा साेहळा दीक्षा व अंजन शलाका महाेत्सव उपधानतप निविघ्नपणे पार पाडले. १ जानेवारी २०२५ राेजी नाशिक येथून विहार करून मुलुंड येथे प्रस्थान केले. त्यांच्या उपस्थितीत मुलुंड येथे मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा साेहळा २५ जानेवारी राेजी हाेणार हाेता व नाशिक येथे ३ दीक्षार्थींची माेठी दीक्षा देखील मुलंड येथे संपन्न हाेणार हाेती. त्यांच्या आकस्मित निधनाने जैन समाजातील तपागच्छ संघात अत्यंत दुखाचे वातावरण व शाेककळा पसरली आहे. नाशिकचे श्री. चिंतामणी जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ त्याचप्रमाणे वणी, सर्व संघातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांची पालखी व चढावे (बाेळी) सकाळी ९.३० वा. सुरु हाेणार असून अंत्ययात्रा सकाळी ११ वा. ऑबेराॅय इनीगमा, मुलुंड पश्चिम येथून निघणार आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

17 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

17 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

17 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

17 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

17 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

17 hours ago