नाशिक

लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगीनघाई

संकरित वाणामुळे गावरान कैर्‍यांची वानवा, दर तेजीत

निफाड ः विशेष प्रतिनिधी
सर्वत्र खरीप पेरणीचे वेध लागले असून, वरुणराजाची हजेरी लागण्यापूर्वी लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगीनघाई सुरू झाली आहे. पण दिवसेंदिवस गावरान आंब्यांची तोड होऊन संकरित वाणाच्या कलमीकरणाकडे सर्वांचाच ओढा वाढल्याने बाजारात गावरान कैर्‍यांची वानवा जाणवत आहे. आवक जेमतेम असल्याने त्याचे भाव दामदुप्पट झाल्याने लोणच्यासाठी लागणार्‍या गावरान कैर्‍या आंबट झाल्याचे चित्र निफाडसह सर्वत्र आठवडे बाजारात पाहावयास
मिळते.
ग्रामीण व शहरी भागात पावसाळा व हिवाळा ऋतूंत दररोजच्या भोजनासोबत आंब्याच्या लोणच्याचा वापर केला जातो. भोजनाचा स्वाद वाढविण्यासाठी विशेष लोणच्यावर भर दिला जातो. शेतावर जाणारे मजूर, कामगार, कष्टकरी भाकरी, ठेच्यासोबत लोणच्यास विशेष पसंती देतात. सध्या पेरणी कामास वेग येण्यापूर्वी सर्वत्र गृहिणी लोणचे बनविण्यासाठी घाई करताना दिसत आहेत. कैर्‍यांसोबतच लोणचे साठविण्यासाठी चिनीमातीच्या बरण्या खरेदी करत आहेत.
कैर्‍या खरेदीपासून तर लोणचे तयार होईपर्यंत यंदा मोठा खर्च येत असल्याने गृहिणींचा आर्थिक गणित कोलमडले आहे. लोणचे टाकण्यापूर्वी कैर्‍या फोडणे आवश्यक असल्याने पन्नास रुपये शेकडाप्रमाणे कैर्‍यांच्या फोडी करून घ्याव्या लागतात. त्यामुळे कैर्‍या फोडणार्‍यांना सुगीचे दिवस आले आहेत. लोणच्यासाठी मीठ, मोहरी, हळद, तेल, लसूण, मिरे, लवंग, तीळ आदी वस्तू लागत असल्याने त्यासाठी दुकानदारांकडे मागणी वाढली आहे.

यंदा बाजारात लोणचे घालण्यासाठी लागणार्‍या गावरान कैर्‍यांची आवक खूप कमी असल्याने भावात दुप्पट वाढ झाली आहे. त्यातच मसालेही महागले. कैर्‍या फोडून देणार्‍यांचेही दर वाढून लोणच्याची चव महागली. पण भोजनाचा स्वाद लोणच्याअभावी हरवल्यागत होतो. शेतावर जाताना भाकरीवर ठेचा अन् लोणचे असले, तर जेवण रुचकर होेते, हे नक्की.
ललिता बोरगुडे, नैताळे

Gavkari Admin

Recent Posts

महापालिकेला एक लाख वृक्ष लागवडीचे टार्गेट

प्रधान सचिवांची ऑनलाइन आढावा बैठकीत सूचना नाशिक : प्रतिनिधी शहरात पन्नास लाखांची वनसंपदा असल्याचे सहा…

16 hours ago

48 सोनोग्राफी केंद्रांची झाडाझडती

भरारी पथकांकडून शहरात धडक मोहीम नाशिक : प्रतिनिधी शहरातील गंगापूर रोडवरील पंड्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदानाचा…

16 hours ago

बत्तीस कोटींचे यांत्रिकी झाडू पावसाळ्यात फेल

वर्षभरात 55 हजार किमी रस्ते सफाईचा दावा; आता चार महिने बंद नाशिक ः प्रतिनिधी गुजरातमधील…

16 hours ago

मुलींनो, खंबीर व्हा..

प्रत्येक मुलीचे जीवनातील महत्त्वाचा क्षण म्हणजे, ज्यावेळी ती सासरी जाते. ज्या घरात ती वावरली, हसली,…

16 hours ago

रागावर नियंत्रण हीच आत्मविकासाची पहिली पायरी

राग ही माणसाच्या मनाची एक सहज आणि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. प्रत्येकालाच राग येतो. कारण सगळं…

17 hours ago

हुंडा की संस्कारांची शिदोरी?

आपलंच खाऊन आपल्याच जीवावर मोठे होणारे एक दिवस आपल्यालाच संपवायला मागे-पुढे बघत नाहीत. म्हणून नेहमी…

17 hours ago