अग्निवीरांचे खडतर प्रशिक्षण सुरू
नाशिक :  प्रतिनिधी
नव्याने देशसेवेत दाखल झालेल्या अग्निवीरांना खडतर प्रशिक्षण आर्टिलरी सेंटरमध्ये सुरू झाले आहे.
पहिली तुकडी 18 ते 24 वयोगटातील  निवडलेली आहे. तरुण तडफदार अशा या प्रशिक्षणार्थ्यांना  आर्टिलरी सेंटरचे प्रशिक्षक खडतर प्रशिक्षण देत आहेत.
भल्या पहाटे या प्रशिक्षणार्थ्यांचा दिवस सुरू होतो आणि लष्कराच्या शिस्तीत सर्व  प्रशिक्षण देण्यात येत आहे.  देशातील विविध राज्यांच्या भागातून अग्निवीर म्हणून निवडले गेलेले हे प्रशिक्षणार्थी देशसेवेसाठी सज्ज होत आहेत. पहाटे पाचपासून सायंकाळी साडेपाचपर्यंत व्यायाम विविध प्रशिक्षणाद्वारे चार विभागात अग्निवीरांना ट्रेनिंग देण्यात येत
आहे.
भारतीय सैन्यामध्ये सेवा बजावता यावी यासाठी केंद्र सरकारने अग्निवीर भरती करण्यासाठी अग्निवीर योजना आणली आहे. या योजनेंतर्गत अग्निवीरांची भरती करण्यात आली आहे. पहिली तुकडी 2640 प्रशिक्षणार्थींची निवड होऊन त्यांचे ट्रेनिंग सुरू झाले आहे. या अग्निवीरांना  टेक्निकल असिस्टंट, रेडिओ ऑपरेटर, गणर,  ड्रायव्हर अशा चार विभागांत त्यांचा कल ओळखून तो तो विभाग दिला जात आहे. 31 आठवडे म्हणजेच सहा महिन्यांचे प्रशिक्षण नाशिक तोफखाना केंद्रातून प्रशिक्षण घेणार्‍या अग्निवीरांना भारतीय सैन्यात तोफा चालविणारा गण तांत्रिक सहाय्यक रेडिओ ऑपरेटर मोटर ड्रायव्हर या चार पदांवर सेवा बजवावी लागणार आहे. यासाठी मूलभूत शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकांकडून देण्यात येत आहे. प्राथमिक सैनिकी शिक्षण दहा आठवड्यांचे तर 21 आठवड्यांचे ऍडव्हान्स सैनिकी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
वीर प्रशिक्षणार्थी प्रतिक्रिया
देशाच्या विविध कानाकोपर्‍यांतून आलेल्या अग्निवीरांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
आम्ही देशसेवेसाठी तत्पर असून, जोशमध्ये वाहून घेतले आहे. हे सहा महिन्यांचे ट्रेनिंग आम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. अग्निवीरांचे प्रशिक्षण काय असते? याचा आम्ही आता प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत.
सर्व टर्म कंडिशन माहिती असून, केवळ 25 टक्केच अग्निवीरांना पुढे संधी मिळणार आहे, हेही माहीत असल्याने आमचं शंभर टक्के योगदान देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
राज्यात पाच ठिकाणी प्रशिक्षण
पुणे, नागपूर, नाशिक, नगर या ठिकाणी अग्निवीर प्रशिक्षणार्थींचे ट्रेनिंग सुरू झाले आहे. नगर येथे दोन सेंटरमध्ये ट्रेनिंग सुरू आहे. आर्टिलरी सेंटर रोडवरील अशोक चक्र प्रवेशद्वारात प्रवेश केल्यानंतर अग्नी रिसेप्शन सेंटर उभारण्यात आले आहे. येथे आल्यानंतर कागदपत्र पडताळणी, त्यानंतर प्रेरणादायी चित्रपट दाखविले जातात. त्यानंतर या प्रशिक्षणार्थींचे कागदपत्र पडताळणी केली जाते. तेथील अधिकार्‍याने सही केल्यानंतरच त्यांना ट्रेनिंगसाठी प्रवेश दिला जातो. त्यानंतर या प्रशिक्षणार्थींना 39 वस्तू दिल्या जातात. यात टोपीपासून बुटांपर्यंत बारीकसारीक रोज लागणार्‍या वेगवेगळ्या ट्रेनिंगसाठी वेगवेगळे ड्रेस, पाणी बॉटल, बेल्ट, बॅग, जॅकेट आदी  वस्तू दिल्या जातात. या प्रशिक्षणार्थींचे केस कापण्यापासून ते लष्करातील जीवनमान कसे असावे, याबद्दल खरंतर प्रशिक्षण दिले जाते. संध्याकाळच्या वेळी विविध क्रीडाप्रकार खेळले जातात. या प्रशिक्षणार्थींना नाश्त्यासह जेवणाची व्यवस्था, योग्य पोषण आहार दिला जात असून, इतर लष्करी प्रशिक्षणाप्रमाणेच यांनाही सर्व सुविधा दिल्या जात आहेत.
पहिल्या टप्प्यात 2640 मुलांची निवड
देशातील विविध राज्यांतील तरुणांनी अग्निवीर परीक्षेसाठी फॉर्म भरले होते. त्यांच्या निवडीनंतर या तरुणांचा तोफखान्याचे कमांडर ब्रिगेडियर ए राकेश यांच्या नेतृत्वाखाली अग्निवीरांसाठी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली आहे. भारतीय सैन्यदलात चार वर्षांसाठी देशसेवा करण्याची संधी या योजनेतील युवकांना देण्यात आली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश केंद्र शासनाने ठेवला आहे. संपूर्ण देशात 25000 तरुणांना अग्निवीरांची सैन्यात भरती करण्यात येत आहे. त्यात पहिल्या टप्प्यात 2640 मुलांची निवड झाली आहे. 2 जानेवारीपासून प्रशिक्षण सुरू झाले आहे.
आठ ऑगस्टपर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहणार असल्याची माहिती आर्टिलरी सेंटरच्या अधिकार्‍यांनी दिली. तसेच दुसरी तुकडी मार्चमध्ये दाखल होणार आहे. त्यांचेही प्रशिक्षण येथेच होणार आहे.
Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

6 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

6 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

7 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

7 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

7 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

7 hours ago