नाशिक

लोकांचे जीव गेले तर जाऊ द्या, आम्ही येथेच दुकान थाटणार!

गर्जना फाउंडेशनचा उपहासात्मक फलक

सिडको : विशेष प्रतिनिधी
सर्वसामान्य लोकांचे जीव गेले तरी चालेल…आम्ही इथेच दुकान मांडणार! हे वाक्य आता केवळ उपरोध न राहता वास्तव बनले आहे. शहरातील काही भागांत प्रशासनाच्या आशीर्वादाने आणि पोलिसांच्या मौनामुळे बेकायदेशीर व्यवसाय, अतिक्रमणे आणि अपायकारक ठिकाणी सुरू असलेले व्यवहार थेट जनतेच्या जीवावर बेतू लागले आहेत.
गोविंदनगर परिसरातील गर्जना फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या विषयावर जोरदार आवाज उठवला असून, त्यांनी ‘आम्ही जीव मुठीत घेऊन जगणारे नाशिककर’ अशी भूमिका घेत धोकादायक परिस्थितीचा निषेध नोंदवला आहे. दोन महिन्यांपूर्वी याच रस्त्यावर अपघात होऊन एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना अजूनही ताजी आहे.
गोविंदनगरसह अनेक भागांमध्ये सार्वजनिक रस्त्यांवरच दुकान थाटून व्यवसाय करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांना धोका निर्माण होत आहे. त्यातच वीज व पाण्याच्या असुरक्षित जोडण्यांमुळे नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. मात्र, नाशिक महापालिका आणि पोलीस प्रशासन या बाबीकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप गर्जना फाउंडेशनने केला आहे.
हे अनधिकृत व्यवहार थांबवण्याऐवजी ते सुरू राहावेत, यासाठी अप्रत्यक्ष सहकार्य दिले जात आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आम्हाला खंबीर साथ नाशिक महानगरपालिका व पोलिस प्रशासनाची असे धाडसी वाक्य गर्जना फाउंडेशनने आपल्या पोस्टरवरून उपस्थित केले आहे.
या परिस्थितीत कोणत्याही क्षणी अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. अशा गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या यंत्रणांविरुद्ध आता जनतेच्या रोषाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
शहर प्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेत, धोकादायक व्यवसाय आणि अनधिकृत अतिक्रमणांविरुद्ध तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा नागरिक आंदोलनाच्या मार्गावर जाण्याचा इशारा देत आहेत.

 

Gavkari Admin

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

7 hours ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

7 hours ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

8 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

8 hours ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

8 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

8 hours ago