नाशिक ः प्रतिनिधी
माहेरपणाला आलेल्या गौराईंना काल जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.मुलगी सासरी जातांना आईवडिलांचा उर भरून येतो पुन्हा लेक माहेरा कधी येते याची वाट पहात निरोप दिला जातो.अशीच भावना गौरांईना निरोप देतांना कुटुंबाची झाली होती.तीन दिवसांचा गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कोरोनाच्या दोन वर्षानंतर सणाचा उत्साहात साजरे होत आहेत.
गौराईंंचे विसर्जन करण्यात आले.महालक्ष्मी,गौराई,ज्येष्ठा कनिष्ठा अशा विविध नावांनी ओळखल्या जातात. महालक्ष्मी माहेराला आल्यानंतर तीन दिवसात आगमन,पूजन,निरोप दिला जातो.
घरोघरी आपआपल्या परंपरेनुसार पूजा,आरती ,नैवेद्य दाखविण्यात आला.माहेरवाशीन आल्यानंतर तीच्या स्वागतासाठी संपूूर्ण कुटुंब महिनापंधरा दिवस अगोदर पासून तयारीला लागत असतात.पूजनाला विविध प्रकारचे नैवेद्य ङ्गराळ,ङ्गळांची आरास मांडण्यात आली. पुरणपोळी,आंबिल कथिलाचा नैवेद्य दाखविण्यात आला.पूजन आणि काल निरोपाच्या दिवशी हळदी कुंकवासाठी एकमेकंीकडे जावून दर्शन घेण्यात आले.