नाशिक

एस टी बसेस चे वाढते अपघात चिंतेची बाब

 

समीर पठाण लासलगाव

मागील अनेक दिवसांपासून राज्यात एसटी बसेसला होणाऱ्या अपघातांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसत आहे.वाहनचालकांचा निष्काळजीपण आणि अती वेगाने बस चालवल्याने हे अपघात होत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.

बसेसच्या या वाढत्या अपघातास खराब झालेल्या बसेस कारणीभूत ठरत आहेत.प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेली एसटी आता प्रवाशांना नकोशी झाल्याने एसटी महामंडळाला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.शिवाय देखभाल आणि दुरुस्ती नसल्याने बस अपघातांच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महामार्गावर नांदूर नाका जवळील मिरची हॉटेल चौकात अपघात घडला होता. ट्रकने खाजगी बसला धडक दिली होती.अपघात झाल्यानंतर काही क्षणातच खाजगी बसने पेट घेतल्याने या 13 लोकांचा मृत्यू झाला होता.याच अपघाताची पुनरावृत्ती म्हणजे गुरुवारी नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाका परिसरात दोन तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.या अपघातानंतर बसने पेट घेतला.या भयंकर अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे अपघात झाल्यानंतर काही क्षणातच एसटी बस आगीत भस्मसात झाली.या घटनेमुळे पुन्हा एकदा मिरची हॉटेल जवळ झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा सुरू आहे

राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या अपघाताच्या बऱ्याच गंभीर घटना राज्यात झाल्या असून यामुळे प्रवाशांची विश्वासार्हता कमी होताना दिसत आहे.त्यामुळे महामंडाळाने वेळीच याची दखल घेत कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.एकंदरीत वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटना पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसबाबत लोकांचा रोष वाढत आहे.त्यामुळे वेळीच काही ठोस पावले उचलली नाही तर ही सुविधा असुविधेत बदलायला वेळ लागणार नाही.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

19 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

21 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago