नाशिक

वाढती थंडी रब्बी पिकांसाठी ठरतेय वरदान

निफाड : विशेष प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून निफाड तालुक्यात वाढती थंडी जाणवत आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश असतानाही हवेत गारवा वाढत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे तापमानात सातत्याने घट होत आहे. निफाड शहर व ग्रामीण भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी घटणार आहे. डिसेंबरमध्ये थंडीचा कहर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

रब्बी पिकांसाठी वाढती थंडी वरदान

वाढती थंडी कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरत आहे. खरीप हंगाम संपल्यावर रब्बी हंगाम सुरू होतो. या हंगामात कांदा, गहू, हरभरा या पिकांना थंड हवामान आवश्यक असते. थंडी वाढल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. पावसामुळे लागवड उशिराने झाली तरी पिकांची वाढ चांगली होईल. राहुरी कृषी विद्यापीठात ६.९ अंश तापमानाची नोंद झाली. थंडीमुळे कीड-रोगांचे प्रमाण कमी होते. जमिनीतील ओल टिकून राहते. कडधान्ये आणि भाजीपाला पिकांना पोषक वातावरण मिळते. मात्र, द्राक्षबागांतील द्राक्षमण्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आरोग्यावर परिणाम आणि आवश्यक काळजी

थंडी वाढल्याने आरोग्याच्या समस्या वाढतात. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दमा, सर्दी-खोकल्याचे रुग्ण यांना त्रास होतो. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये ताप, सांधेदुखी, त्वचाविकार यांचा समावेश आहे. शरीर उबदार ठेवणे गरजेचे आहे. सकाळी-संध्याकाळी गरम कपडे वापरा. गरम पाणी आणि हलका व्यायाम करा. सूप, तूप, गूळ, हळद, लसूण यांचा आहारात समावेश करा. रोगप्रतिकारशक्तीसाठी झोप, आहार आणि व्यायाम यांचा समतोल राखा, असे डॉ. दिलीप कुमावत यांनी सांगितले.

थंडीत सामाजिक उपक्रमांची गरज

पहाटे आणि रात्री गारठ्याचा प्रभाव वाढला आहे. नागरिकांना शेकोट्यांचा आधार घ्यावा लागतोय. ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या जात आहेत. लोकरीचे कपडे, स्वेटर, जॅकेट, ब्लँकेट यांना मागणी वाढली आहे. रस्त्यावर झोपणारे गरजू आणि वृद्धाश्रम-अनाथाश्रमांतील लोकांसाठी उबदार कपड्यांचे वितरण गरजेचे आहे. स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढे यावे. निष्काळजीपणा टाळून सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

10 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago