शिवालये गजबजली; उपासनेवर भर

नाशिक ः देवयानी सोनार
संकटात आठवतो तो देव. आयुष्य जगतांना येणार्‍या अडचणी दूर व्हाव्या ,सुसह्य व्हाव्या, मार्ग निघावा यासाठी समाजमन भक्तीमार्गाचा,श्रद्धा, आस्थेचा आसरा शोधत असते. मालेगावला पार पडलेल्या शिवपुराण कथेनंतर जिल्ह्यातील शिवालयांमध्ये गर्दी वाढली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एरव्ही दर सोमवारीच शिवालयांमध्ये जाणारे भाविक आता नित्य सकाळ, सायंकाळ जात असल्याने शिवालये गजबजून गेली आहेत.
सिहोरचे प्रदिप मिश्रा यांनी भगवान महादेवाची भक्ती,पूजा,आरती जीवनातील विविध समस्यांवर क शा प्रकारे मात करू शकतात, मार्ग कसे काढता येतो याबाबत मालेगाव येथील  शिवपुराण कथेमध्ये मार्गदर्शन केले. मालेगावला झालेल्या या शिवपुराण कथेला उत्तर महाराष्ट्रातील भाविक-भक्तांनी गर्दी केल्याने कधीकाळी दंगल, कोरोनामुळे बदनाम झालेले मालेगाव शहर भक्तीमार्गामुळे संपूर्ण राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आले.

हेही वाचा: माझा ‘बाप्पा’ मीच साकारणार!

या शिवपुराण कथेमुळे मालेगावला तर मिनी कुंभमेळ्याचीच अनुभूती आली होती. या शिवपुराण कथेचा समारोप झाला असला तरी आता टीव्हीवर ही शिवपुराण कथा ऐकण्याचा आनंद भाविक घेत आहेत. या कथेचा परिणाम म्हणून शिवालयांमध्ये सद्या महिलांचा मोठा राबता वाढला असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यासह शहर आणि उपनगरातील शिवमंदिरांमध्ये महिला पुरूष आणि लहान मुलांचाही पूजनासाठी सहभाग वाढला आहे. पंडीत प्रदीप मिश्रांच्या प्रवचनात वारंवार एक लोटा जल सारे समस्यां का हल असा उल्लेख केला  आहे.त्यामुळे भाविकांनी दर्शन आणि अभिषेकासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे.
भजन कीर्तन अध्यात्माद्वारे आत्मिक समाधान शोधण्याचे काम केले जाते. जनजागृती प्रबोधन मार्गदर्शन यातून भाविकांच्या अंतरीचा ठाव घेता येतो. त्यामुळे भाविकही अशा कार्यक्रमांना गर्दी करतात. कोरोना संकटामध्ये अनेकांनी साखळी पारायण,साखळी मंत्र जपणे आदी आपआपल्या रुढी परंपरेप्रमाणे संकटातून मुक्ती वा अध्यात्मीक मार्गातून मनशांती मिळविण्याचे प्रयत्न केले होते.
त्यामुळे देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे असो वा संकटकाळात मानसिक शांती,अडचणीतून बाहेर पडण्यासाठीची आराधना असो एक ठराविक देवाचे भजन पूजनाद्वारे अध्यात्मिक मार्ग शांतता मिळविली जाते.
नर्सरीत बेलाच्या रोपांना मागणी
नर्सरीमध्ये बेलाच्या रोपांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. फुलझाडे, शोभीवंत वृक्षांच्या रोपांबरोबरच आता बेलाच्या रोपालाही मोठी मागणी वाढली असल्याचे चित्र नर्सरींमध्ये पाहावयास मिळत आहे.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

5 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

6 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

6 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

6 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

6 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

7 hours ago