अन्यायाविरोधात संघटनेचा एल्गार
नाशिक : प्रतिनिधी
निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी रात्रंदिवस जीवाची बाजी लावणार्या महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना अत्यल्प भत्ता देऊन अपमानित करण्यात आल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केला आहे. या संदर्भात पोलीस बॉईज चॅरिटेबल ट्रस्ट संचालित महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले यांनी राज्य निवडणूक आयोगाला 16 जानेवारीला निवेदन सादर दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, निवडणुकीदरम्यान विविध विभागांतील कर्मचार्यांना वेगवेगळ्या प्रमाणात भत्ते देण्यात आले असून, पीआरओ यांना 2000 रुपये, शिपाई व चपराशी यांना 1500 रुपये, तर प्रत्यक्ष निवडणूक बंदोबस्ताची संपूर्ण जबाबदारी सांभाळणार्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना केवळ पाचशे रुपये भत्ता देण्यात आला. हा भेदभावपूर्ण निर्णय असून, पोलिसांवर अन्याय करणारा असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान प्रक्रिया, मतदान यंत्रांंची वाहतूक, मतमोजणी व निकाल जाहीर होईपर्यंत संपूर्ण काळात पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस पहारा देत असतात. दंगल, गोंधळ अथवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जीव धोक्यात घालून बंदोबस्त ठेवणारा पोलीसच असतो. निवडणूक अधिकार्यांपासून मतदारांपर्यंत सर्वांची सुरक्षा पोलिसांच्या खांद्यावर असते, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही अशा महत्त्वपूर्ण सेवेसाठी केवळ पाचशे रुपयांचा भत्ता देणे म्हणजे पोलिसांच्या मेहनतीचा अपमान असल्याची तीव्र भावना पोलिसांच्या कुटुंबीयांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना किमान पाच हजार रुपयांचा वाढीव भत्ता देऊन त्यांचा सन्मान राखावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास सोमवारनंतर निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयावर हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…