चित्त सुप्रसन्न जे वेळ।
तो पुण्यकाळ साधका॥

(एकनाथी भागवत अ. 19, ओवी 166)

आपण गृहप्रवेश, विवाह, नवीन व्यवसाय सुरू करणे आणि प्रवास याकरिता शुभ वेळ किंवा मुहूर्त पाहतो. ज्यावेळी मन आनंदी व भगवत चिंतनात असते तो सर्वच काळ शुभ असतो. आपलं मन भयभीत किंवा चिंतेत असेल तर तो काळ अशुभ असतो. म्हणून अमावास्या, ग्रहण किंवा पंचांग पाहून शुभाशुभ काळ ठरवू नये. ज्यावेळी मन आनंदी व भगवत चिंतनात असेल त्यावेळी कार्याची सुरुवात करावी.
सर्वसामान्य जन भगवंतावर श्रद्धा, त्याची आपल्यावर कृपादृष्टी राहून संसारी ऐश्वर्य कायम प्राप्त व्हावे, यासाठी श्रद्धा जास्त व भक्ती म्हणून कमी जोपासताना दिसतात.
श्रीसूक्तात एक शब्द येतो तो म्हणजे अनपगामिनी. या शब्दाचा अर्थ सुस्थिर, अन्यत्र न जाणारी अशी लक्ष्मी मला लाभो, असा आहे. सर्व जाणतात की, लक्ष्मी चंचल आहे आणि ती फक्त एका ठिकाणी स्थिर आहे ते स्थान म्हणजे नारायणाचे चरण. मग लक्ष्मी आपल्याकडे स्थिर व्हावी असे वाटत असेल तर हृदयी नारायणाला आणून बसवावे, अन्यथा लक्ष्मी चंचल आहे हे सर्वजण जाणतातच.
ज्योतिषशास्त्रात असा ठोकताळा (ढर्हीाल र्ठीश्रश) आहे की, सूर्योदयाला जी तिथी उदित असेल ती त्या सर्व दिवशी लागू पडते. अशावेळी काही सण, उत्सव हे सोयीनुसार साजरे केले जातात. सगळीच गंमत. हे सर्व घडते ते तिथी सुरुवात व तिथी समाप्ती काळाच्या घोळामुळे.
हे सर्व शास्त्र म्हणून ठीक आहे; परंतु साधं गणित असं आहे की, देवाची भक्ती, पूजा, शुभकार्य इत्यादीसाठी मुहूर्त पाहणे यांसारखा खुळेपणा नाही. कारण देवाची भक्ती करण्याची इच्छा होणे हाच शुभ मुहूर्त. शुभशकुन.
म्हणून जगद्गुरू तुकोबा म्हणतात…

अवघा तो शकुन।
हृदयीं देवाचे चिंतन॥
हृदयात देवाचे चिंतन किंवा नामस्मरण घडणे, हाच शुभशकुन.
या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबा म्हणतात…
तुका म्हणे हरिच्या दासां।
शुभकाळ अवघ्या दिशा॥

एकदा हरीचे दास्यत्व म्हणजे मनापासून भक्ती करायचे अंगीकारले मग अवघ्या दिशा, काळ शुभच.
हरिचरणी अवघे अशुभ लय पावते.

Editorial Team

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

2 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

2 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

3 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

3 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

3 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

3 hours ago