जऊळके दिंडोरी येथील कंपनी आगीत भस्मसात

जऊळके दिंडोरी येथील कंपनी आगीत भस्मसात

दिंडोरी: प्रतिनिधी

तालुक्यातील जऊळके दिंडोरी येथे काजू प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला लागलेल्या आगीत लाखोचा माल भस्मसात झाल्याची घटना पहाटे घडली आहे.  जउळकेदिंडोरी येथील सरस्वती नगर मधील संदेश किशोर गुप्ता यांच्या मालकीचे रेखान ऍग्रो या काजू प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला आज शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत लाखोचा कच्चामाल जळाल्याची घटना घडली.आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी नाशिक महापालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले त्यांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली .जानोरी चे कामगार तलाठी किरण भोये व दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *