महाराष्ट्र

जाये तो जाये कहा!

कामगारवर्ग हा जगाचा आधारस्तंभ आहे, परंतु दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. दरवर्षी 1 मे जगभर आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो.परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कामगार दिवस काळोखात असल्याचे आपण पाहिले. त्याचबरोबर मागील दोन वर्षांत कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे भारतासह जगभर कामगारांचे हाल-बेहाल झाल्याचे सुद्धा आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले. आज जगाचा विचार केला तर 80 टक्के लोक कामगारांमध्ये मोडतात. यात अनेक क्षेत्रांतील कामगार वर्ग दिसून येतात. शेतीतील कामगार असो, कारखान्यातील कामगार असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील कामगार असो त्याची अत्यंत दयना अवस्था आहे. परंतु दोन वर्षांच्या काळात कोविड-19 कामगारांसाठी मौत का कुआ बनल्याचे जगाने पहिले.कोरोना काळात भारतासह जगभरात कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचे दिसून आले. ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची घटना होती.आज विकसित, विकसनशील, गरीब या संपूर्ण देशांतील कामगारांवर जीवन-मरणाचा प्रश्न उद्भवत आहे. आज भारताचा विचार केला तर भारताची लोकसंख्या 135 कोटींच्या घरात आहे. यात कामगारवर्गाचा विचार केला तर 80 टक्के लोक कामगारांमध्ये मोडतात. यावरून आपण विचार करू शकतो की, कोविड-19 च्या संक्रमणामुळे कामगारांचे किती हाल-बेहाल झाले असतील. ही बाब संपूर्ण जगाने उघडल्या डोळ्यांनी पाहिली. कोरोना काळात स्वत:च्या गावाला जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक कामगार आपल्या गावाला जाण्याकरिता 200, 500, 900 किलोमीटरपर्यंत पायदळ चालतानाचे दृश्य आपण पाहिले. देशाचा विचार केला तर राजकीय पुढार्‍यांजवळ अरबो-खरबो रुपयांची चल-अचल संपत्ती आहे. ही संपत्ती राजकीय पुढार्‍यांनी कामगारांच्या प्रती उपयोगात आणली तर एक मदतीचा मोठा हात समजला जाईल. कामगार जगाचा शिल्पकार मानला जातो. यांची भूमिका देशासाठी व जगासाठी महत्त्वाची असते. आज शिल्पकाराचे हाल-बेहाल होत असल्याचे दिसून येते. कामगार हा जगाचा मोठा आधारस्तंभ आहे. कामगार नाही तर काहीच नाही.
रमेश लांजेवार

Bhagwat Udavant

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

12 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

14 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

1 day ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

1 day ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

1 day ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

1 day ago