कामगारवर्ग हा जगाचा आधारस्तंभ आहे, परंतु दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. दरवर्षी 1 मे जगभर आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो.परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कामगार दिवस काळोखात असल्याचे आपण पाहिले. त्याचबरोबर मागील दोन वर्षांत कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे भारतासह जगभर कामगारांचे हाल-बेहाल झाल्याचे सुद्धा आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले. आज जगाचा विचार केला तर 80 टक्के लोक कामगारांमध्ये मोडतात. यात अनेक क्षेत्रांतील कामगार वर्ग दिसून येतात. शेतीतील कामगार असो, कारखान्यातील कामगार असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील कामगार असो त्याची अत्यंत दयना अवस्था आहे. परंतु दोन वर्षांच्या काळात कोविड-19 कामगारांसाठी मौत का कुआ बनल्याचे जगाने पहिले.कोरोना काळात भारतासह जगभरात कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचे दिसून आले. ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची घटना होती.आज विकसित, विकसनशील, गरीब या संपूर्ण देशांतील कामगारांवर जीवन-मरणाचा प्रश्न उद्भवत आहे. आज भारताचा विचार केला तर भारताची लोकसंख्या 135 कोटींच्या घरात आहे. यात कामगारवर्गाचा विचार केला तर 80 टक्के लोक कामगारांमध्ये मोडतात. यावरून आपण विचार करू शकतो की, कोविड-19 च्या संक्रमणामुळे कामगारांचे किती हाल-बेहाल झाले असतील. ही बाब संपूर्ण जगाने उघडल्या डोळ्यांनी पाहिली. कोरोना काळात स्वत:च्या गावाला जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक कामगार आपल्या गावाला जाण्याकरिता 200, 500, 900 किलोमीटरपर्यंत पायदळ चालतानाचे दृश्य आपण पाहिले. देशाचा विचार केला तर राजकीय पुढार्यांजवळ अरबो-खरबो रुपयांची चल-अचल संपत्ती आहे. ही संपत्ती राजकीय पुढार्यांनी कामगारांच्या प्रती उपयोगात आणली तर एक मदतीचा मोठा हात समजला जाईल. कामगार जगाचा शिल्पकार मानला जातो. यांची भूमिका देशासाठी व जगासाठी महत्त्वाची असते. आज शिल्पकाराचे हाल-बेहाल होत असल्याचे दिसून येते. कामगार हा जगाचा मोठा आधारस्तंभ आहे. कामगार नाही तर काहीच नाही.
रमेश लांजेवार
नाशिक: प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साधू महंत यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळ येथे आगमन नाशिक : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…
मनमाड : आमिन शेख मनमाड जे जंक्शन स्थानक असुन या ठिकाणी रोज काहींना काही घटना…
फॅशन वीक म्हणजे फक्त डिझायनर कपडे, कॅमेर्यांचे फ्लॅश आणि रॅम्पवॉक एवढ्यावरच मर्यादित नसते, तर ती…
1. आरामदायक फुटवेअर निवडा उन्हाळ्यात पायांना घाम येणे आणि दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. म्हणून अशा…
अहिल्यादेवी होळकर म्हणजे तुम्हा-आम्हा सर्वांच्या मनात असणारी ती प्रतिमा की, ज्यात सात्त्विकता, सुशीलता, शीतलता, पवित्रता,…