जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास
निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध
लासलगाव : समीर पठाण
निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडी धरणात सोडू नये या मागणीसाठी नांदूर मधमेश्वर धरण येथे आर्किटेक अमृता वसंतराव पवार यांच्या नेतत्वाखालील निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला तसेच या मागणीचे लेखी निवेदन अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले.
यंदा नाशिक जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे निफाड व येवला तालुक्यातील नागरिकांना अल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने निफाड व येवला तालुक्याचे हक्काचे पालखेड धरणाचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणा मार्गे जायकवाडी धरणात सोडण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.शासनाने आमचे म्हणणे ऐकून घेत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी आर्किटेक अमृता पवार यांनी या वेळी केली.
या वेळी मिलन पाटील,अरुण आव्हाड,बाळासाहेब कुर्य, लहानु मेमाणे,रवींद्र आहेर यांच्यासह येवला तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच येवला निफाड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाने आमच्या मागणीचा विचार करून येवला निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी जोरदार मागणी या वेळी आंदोलनकर्त्यांनी या वेळी केली
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…