भाजपाच्या उमेदवाराचा दारूण पराभव
कोल्हापूर : कॉंग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी अठरा हजाराहून अधिक मतांनी दणदणीत विजय प्राप्त केला. भाजपाने या निवडणुकीसाठी मोठी ताकद पणाला लावली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले अशा दिग्गजांनी येथे जोरदार प्रचार मोहीम राबवूनही शेवटी कॉंग्रेसचीच सरशी झाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे लागलेल्या शुक्लकाष्ठामुळे भाजपाचे हौसले बुलंद झाले होते. ही निवडणूक चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरचेच असल्याने त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. कॉंग्रेसने माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना तर भाजपाने पालिकेतीलच सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली होती. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ऑनलाइन सभेच्या माध्यमातून शिवसैनिकांना जाधव यांच्या विजयासाठी आवाहन केले होते. काल मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच जाधव या आघाडीवर होत्या. अठरा हजार मतांची आघाडी शेवटपर्यंत राखत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. या निवडणुकीमुळे कॉंग्रेसला नवसंजिवनी मिळाली आहे.
लोकीचे वैकुंठ पंढरपूर येथे होणारा आषाढीवारीचा महामेळा महाराष्ट्राचे आध्यात्मिक व सांस्कृतिक संचित आहे. 12 व्या…
हाराष्ट्राचे आध्यात्मिक, परमार्थिक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे पंढरीची वारी. महाराष्ट्रात भीमा नदीतीरावर असणार्या लोकविख्यात पवित्र तीर्थक्षेत्र…
हाराष्ट्रात धर्माला फार महत्त्व दिले जाते. धर्मतेज जागवणारा पंढरीचा विठोबा हा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि…
साडी ही भारतीय परंपरेचा गोंधळलेला मोहक गंध. पण आजच्या काळात ती केवळ साडी न राहता,…
पावसाळा म्हणजे गारवा, सरींचा आनंद आणि त्याचबरोबर अनेक अडचणीही. यांपैकी एक मोठी समस्या म्हणजे कपड्यांवर…
चित्त सुप्रसन्न जे वेळ। तो पुण्यकाळ साधका॥ (एकनाथी भागवत अ. 19, ओवी 166) आपण गृहप्रवेश,…