एवढी क्रुरता येते कुठून?

क्षुल्लक कारणातून खुनासारख्या घटनांत वाढ
नाशिक ः प्रतिनिधी
शहरातील धु्रवनगर येथील अवघ्या चार महिन्याच्या पोटच्या मुलीच्या गळा चिरला.सुशिक्षीत महिलेने असे विकृत कृत्य केले.दुसर्‍या घटनेत मुंबई लालबाग येथील 24 वर्षीय तरूणीने पंचावन्न वर्षीय आईची हत्या केली. अगोदर हत्येचा बनाव केला. मृतदेहाचे तुकडे केले अशी कबुली दिली. या अशा घटनांवरून एवढी क्रुरता येते कुठून असा प्रश्‍न सर्वसामान्यंाना पडला आहे.
आप्तस्वकीय एकमेकांचे जीवलग जीवाला जीव देणारे,जीव की प्राण असलेले नाते एका क्षणात विश्‍वास बसणार नाही असे कृत्य करतात. रागाच्या भरात असे कृत्य घडते किंंवा जाणीवपूर्वक केले जाते. अनेक दिवसांची धुसपूस, राग मनात ठेवून एक दिवस त्याचा विस्फोट घडतो. त्यानंतर पश्‍चातापाशिवाय हाती काही लागत नाही. आई मुलीचे नाते असो वा कोणतेचही एकमेकीचे आयुष्य पूर्ण होवू शकत नाही अशा नात्यात एकमेकींचे जीव घेण्याइतपत कोणत्या भावना दडलेल्या असतात की अशा एकमेकींचा जीव घेण्याइतपत अनावर होतात.
मानसोपचारतज्ज्ञंाच्या मते महिला असो वा पुरूष घरात असलेले ताण-तणाव,सततचा उपहास,अपमान,हार्मोनल ,मानसिक ,भावनिक त्रास असू शकतो. त्याशिवाय सोशल मीडिया ,टी,व्ही आदींवर हिंसक दृष्ये,मालिकांमधून दाखविले जातात. क्षणात एकनिष्ट असलेले नाते दुसर्‍या क्षणाला शत्रुसारखे बदललेले दाखवतात. मानसिक विकृती असल्यासारखे नातेसंबध प्रेक्षकांना बुचकाळ्यात टाकले जाते. त्यासाठी घरातील वातावरण,आर्थिक,मानसिक,भावनिक चांगले असल्यास असे प्रकार कमी घडण्यास मदत होईल.

 

अशा भयानक घटना आज काल बर्‍याच ऐकण्यात येत आहे. याच्या मागचे कारण चिडचिड राग किँवा घरात असलेले ताण-तणाव असू शकतात. महिलांना असलेले दबाव त्या व्यवस्थित मॅनेज करू शकत नाही. त्यांना ह्यात कोणाचीही मदत बराचदा नसते किँवा असलेल्या आर्थिक त्रासाला सामोरे जात असतांना असे कृत्य घडू शकते. जर एखाद्या बाईला मानसिक किंवा भावनिक त्रास असेल तर त्या मानसिक अवस्थेत ते हे कृत्य करू शकतात. जर कोणत्या बाईला हार्मोनल काही त्रास असतील तर त्यामुळे सुद्धा असे कृत्य घडू शकते. अशा वेळेस त्यांचे त्रास समजून ते ओळखून त्यांना गरजेनुसार उपचार दिला गेला पाहिजे असं झाल्यास असे कृत्य समाजात कमी होतील.
– क्रांती पुरंदरे,
आरसीआय लायसन्स क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

16 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

20 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

20 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago