लासलगाव येथे ‘नाफेड’मार्फत लाल कांदा खरेदी सुरू
लासलगाव:समीर पठाण
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीला सुरुवात केली आहे.कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.त्यामुळे ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदीची शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती.
या पार्श्वभूमीवर नाफेडने कांदा खरेदी करण्याची परवानगी ज्या संस्थांना दिली आहे त्यापैकी न्युट्रोव्ही ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी नाशिक(फेडरेशन)मार्फत कृष्णधारा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी खडक माळेगाव या संस्थेने लासलगाव येथे लाल कांद्याची खरेदी सुरू केली असून शुक्रवारी खडक माळेगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी राजेंद्र यशवंत शिंदे यांचा ३५ क्विंटल लाल कांदा ९३१ रु प्रती क्विंटल दराने खरेदी केला असल्याची माहिती न्युट्रोव्ही ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चे सीईओ तथा नोडल ऑफिसर विलास आहीरे यांनी दिली.कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून ४५ ते ५५ एम एम आकारात कांदा विक्रीसाठी आणावा असे आवाहन विलास आहीरे यांनी केले.
सद्यःस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किमती विचारात घेता ‘नाफेड’मार्फत लाल कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून नाफेड च्या कांदा खरेदी मुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप व पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुरासे यांनी या वेळी सांगितले तसेच नाशिक जिल्ह्यात अजून नाफेड चे कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा जेणे करून शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य तो बाजार भाव मिळण्यास मदत होईल असेही सुवर्णा जगताप यांनी या वेळी सांगितले.या वेळी कृष्णधारा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चे चेअरमन चंद्रशेखर शिंदे,संदीप ठोंबरे,रंजना जगताप,संतोष पानगव्हाणे तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…