लासलगाव: समीर पठाण
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या शुल्कामुळे शेतकरी संतप्त झाले होते.लासलगाव सह जिल्ह्यातील बाजार समित्या गेल्या दोन दिवसांपासून बंद होत्या.आज गुरुवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारावर कांद्याचे लिलाव सकाळी पूर्ववत सुरू झाले मात्र नाफेड लासलगाव येथे प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेत सहभागी न झाल्यामुळे तसेच खाजगी व्यापाऱ्यांनी
नाफेडच्या कांदा खरेदी दरापेक्षा कमी बोली पुकरल्यामुळे
लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रातील लिलाव संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बंद पाडले .
केंद्र सरकार नाफेड मार्फत 2410 प्रतिक्विंटल भावाने 2 लाख मेट्रिक टन इतका कांदा खरेदी करेल अशी घोषणा सरकारने केली.मात्र तरीही खाजगी व्यापारी लिलाव सुरु झाल्यावर 1900 ते 2000 रुपये इतक्याच दराने कांदा खरेदी करत असल्याने शेतकरी संतापले आहे.अजून पर्यंत नाफेड ने लासलगाव येथे कांदा खरेदी सुरू केलेली नाही.नाफेड ने लासलगाव बाजार समितीच्या लिलाव आवारात प्रत्यक्ष सहभागी होऊन कांदा खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी या वेळी केली तसेच या वेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली
शेतकऱ्यांना कांदा खरेदीचा भाव २४१० रुपये मिळणे अपेक्षित होता मात्र प्रत्यक्षात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव आवारात ज्यावेळी लिलाव सुरू झाले त्यावेळी खाजगी व्यापाऱ्यांनी १९०० ते २००० रुपये प्रति क्विंटल ची बोली पुकारली त्यामुळे शेतकरी संतापले व कांदा लिलाव बंद पाडले.नाफेड ने लासलगाव बाजार समितीच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन प्रत्यक्ष कांदा खरेदी करावा अशी जोरदार मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…