आयुष्याला आली ‘शोभा’!

पतीच्या अकाली निधनानंतर एकटी पडले. पुरती खचून गेले. आत्महत्येचाही विचार मनात आला. पण डोळ्यासमोर माझी मुले दिसत होती. त्यामुळे संघर्ष करण्याचे ठरविले. ’उमेद’च्या माध्यमातून जगण्याला नवी दिशा मिळाली. विल्होळी, ता. नाशिक येथील शोभा प्रभाकर वाघ यांची ही संघर्ष कथा समाजातील एकल महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
पतीचे निधन झाले. सर्व जबाबदारी एकटीवरच येऊन पडली. घरात कमावणारे कुणीच नव्हते. इतर मुले किती आनंदात राहतात. नीटनेटकी राहतात. त्या तुलनेत आपल्या मुलांना किती संघर्ष करावा लागतोय, हे पाहून जीव तुटायचा. कधीकधी तर एक वेळ जेवणाचीही भ्रांत होती. पण ठरविले आता रडायचे नाही, तर लढायचे. उमेद अभियानाबद्दल माहिती मिळाली. त्यांनी जिल्हा नियोजन निधीतून स्टॉल मिळाला. या दुकानाची साथ लाभली आणि जगण्याला बळ मिळाले. आयुष्यात अनेक प्रसंग येतात. पण न डगमगता या प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ परिस्थितीच देत असते. शासनाच्या एकल महिला योजनेतून कुटुंबाला आधार मिळाला. आर्थिक स्वालंबनातून व्यक्तिमत्त्वात बदल झाला. स्वत: कमावती झाल्यामुळे मुलांचे शिक्षण, आरोग्य यांचा प्रश्न मिटला. मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊ शकले.

Life has become ‘beautiful’!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *