डोंबिवली कल्याण मधील रेल्वे लोको पायलटने केली आत्महत्या

कल्याणमध्ये ‘लोको पायलट’ची आत्महत्या

शहापूर: प्रतिनिधीडोंबिवली – कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून कार्यरत असलेल्या सुजित कुमार यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. सुजित यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे कर्मचारी बोलत आहेत.

सुजित कुमार हे कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात रहाण्यास होते. ते मुंबई रेल्वेत लोको पायलट म्हणून काम करत होते. सुजितने प्रशिक्षण पूर्ण केले होते, त्यात तो पासही झाला होता. पण नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला ड्युटीवर घेतलेच नाही. तब्बल तीन महिन्यांसाठी त्याला निलंबित करण्यात आले होते.

सुजित कुमार याला सप्टेंबर महिन्यापर्यंत निलंबित केले गेलं आहे. आर्थिक परिस्थिती खराब झाल्यावर त्याने असे पाऊल उचलले असावे असे लोको पायलट म्हणून कार्यरत असलेल्या हरिश चिंचोले यांनी सांगितले. तसेच इतर कर्मचाऱ्यांनी याच कारणामुळे सुजित याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळवणूक सुरु असल्याचा आरोप देखील केला आहे. सुजित कुमारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आला आहे. यावेळी रुग्णालय परिसरत तसेच रेल्वे मोटरमन कार्यालयाच्या बाहेर रेल्वे कर्मचारी गोंधळ घातला. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. कारवाई होत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रेल्वे पोलिस व आरपीएफ जवानांनी जमावास पांगवले. यानंतर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

1 day ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

1 day ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

1 day ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

1 day ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

1 day ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

1 day ago