नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात टप्प्यात मतदान होणार आहे, मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली, लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने आता राजकीय हालचाली ना वेग येणार आहेत, पहिला टप्पा 19 एप्रिल ला असणार आहे, महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल, त्यात देखील पाच टप्पे करण्यात आले आहेत, पहिला टप्पा 26 एप्रिल, दुसरा 7 मे, तिसरा 13 मे, 20, 25 मे रोजी मतदान होईल,
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत, सर्वांचे लक्ष तारखाकडे लागले होते, आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे काल च निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. लोकसभा निवडणूक बरोबरच मुदत संपलेल्या आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, ओडिशा या विधानसभेच्या निवडणुका देखील लोकसभे बरोबरच होतील. देशात एकाच दिवशी 4 जूनला मतमोजणी होणार आहे. पहिला टप्पा19 एप्रिलला तर शेवटचा टप्पा 3 जूनला होईल, 4 जूनला मतमोजणी होईल,