महागाईपुढे डाळ शिजेना, कोणती भाजी करू?

गृहिणींपुढे गंभीर प्रश्‍न; भाजीपाला शंभरीपार!
नाशिक ः प्रतिनिधी
एकीकडे सर्वच प्रकारच्या डाळींचे भाव कडाडले असतानाच, भाजीपाल्याचे दरही शंभरीपार गेल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. भाजी तरी कोणती करावी? असा प्रश्‍न घराघरांत सतावत आहे.
दमदार पावसाला सुरुवात झाल्यापासून भाजीपाला दरात वाढ झाली आहे. संततधार पाऊस होत असल्याने शेतातच भाजीपाला पिवळा पडण्याचे प्रमाण वाढले असल्याने बाजारात येणार्‍या भाजीपाला आवकवर मोठा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे भाजीपाला दरात तेजी आली आहे. गवार 150 रुपये तर दुधी भोपळा प्रतिनग 25 ते 30 रुपये मिळत आहे. त्यात डाळी, कडधान्य, किराणामालाचेही भाव चढेच असल्याने गृहिणींची स्वयंपाकाची कसरत होत आहे.
पावसाळ्यात भाजीपाला मुबलक येत असला तरी अतिवृष्टीमुळे भाजीपाला सडतो, पिवळा पडतो, त्याशिवाय गवारसारख्या भाज्यांना उष्ण वातावरण हवे असते. त्यामुळे पावसाच्या वातावरणाचा परिणाम होत असल्याने आवक कमी होत आहे. परिणामी, गवारचे भाव 150 रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. टोमॅटोची आवक वाढल्याने दर कोसळले आहेत.
पालेभाज्या पावसाळ्यात लवकर खराब होतात. त्यामुळे कोरडी आणि विनामातीच्या भाजीला चांगला भाव मिळतो. त्यामुळे मेथी, पालक, शेपू, कांदापात, कोथिंबीर यांना जुडीला 40 ते 50 रुपये मोजावे लागत आहे. उन्हाळ्यात वीस ते तीस रुपयांना तीन लिंबू मिळत होते. ते आता दहा रुपयांत तीन तर किलोला 70 रुपये मिळत आहे. चांगल्या आल्यालाही 60 ते 70 रु. किलो भाव
आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

2 days ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

2 days ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

2 days ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

2 days ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

2 days ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

2 days ago