महाराष्ट्र

मरण स्वस्त झालंय का?

कारण छोटं असो वा मोठं पण त्यावेळचा अनावर झालेला राग किंवा अतिनिराशा मनाला आत्महत्येसारखे कृत्य करायला भाग पाडते…अवतीभोवती समाजात सतत ऐकायला येणारी ही गंभीर समस्या होत चाललीय…पण हे कितपत योग्य वाटतं जाणार्‍याला, जगणंच संपवणे हे समस्येचे उत्तर कसे असू शकते? खरंच मरण एवढं स्वस्त झालंय का?
खूप प्रश्‍न पडतात अशा घटनांबद्दल काही पेपरला वाचल्यावर, कुठे ऐकले, कुठे बघितले तर मन सुन्न होतं…घडणार्‍या घटना घडून जातात…पण मागच्या कुटुंबातल्या सदस्यांचं काय होणार, हा प्रश्न पडत नसावा का जाणार्‍या जीवाला? हा विचारच केला जात नाही का? मान्य आहे कधीकधी मानसिक ताणतणाव, पैशाचा अभाव, पती-पत्नीतले वादविवाद, न मिळणारे प्रेम, तरुणाईपुढची नोकरीची समस्या, आजारपण, सुडाची भावना, तर कधी अतिनैराश्य मनाला नकारात्मक विचाराकडे वळवते…पण हे सारं टाळता यायला हवंच..
कुठलीही वेळ थांबत नाही, मग सुख असो वा दुःख, संकट टळेपर्यंत संयम, खंबीरता नावाचं शस्र अंगी बाळगायलाच हवं तरच प्रतिकार करू शकता … मृत्यूवर पाय रोवून पुढे जाता येईन…आणि कष्ट करत पुढे जायलाच हवं तेव्हा सुखाचा मार्ग भेटतोच…ही वेळही निघून जाईन यावर विश्‍वास ठेवायला हवा…
मागे एकदा वाचले होते वृत्तपत्रात की नववीतल्या मुलाला सर रागावले. अपमान झाला म्हणून घरी येऊन फाशी घेतली ..पण त्या आई-बापाचा टाहो त्याने ऐकला असेल का..जिने नऊ महिने पोटात वाढवले, रात्री पहाटे उठून दूध पाजले, मोठे केले…तिच्या कष्टाचे मोल असे फेडतात का ?
घरातले सततच्या वादाला मैत्रिणीने आत्महत्या केली, पण मागे लेकरांचा टाहो तिने ऐकला असेल का..मुलं आईविना कशी मोठी होतील, कोण माया लावेन, हा प्रश्‍न तिला पडला नसावा का?
शेतीत सतत अपयश, कुणाला व्यवसायात अपयश, कर्जबाजारीपणा वाढला म्हणून एकाने स्वतःला संपवून मुक्ती मिळवली. पण बायकोपोरांचा विचार यायला हवा ना…त्यांनी कुणाकडे बघायचं..! जगायचे तर शेवटपर्यंत सोबतीनेच जगावे मग कितीही संकट येवो…
यासाठी कुटुंबात पती-पत्नीने एकमेकांना भरपूर प्रेम, विश्‍वास, मानसिक, शारीरिक, भावनिक सर्व स्तरावर आधार दिला पाहिजे तेव्हाच आयुष्यातील कुठलेही वादळ सहज पार होऊन जाईन..आणि असे विचार मनात येणार नाही …नाहीतर कुणामुळे कुणीतरी जग सोडून जावं एवढं जगणं कठीण होऊन बसतं…! आणि आयुष्यभर आपराधीपणाची सल मनात रहाते …की जाणार्‍याला वाचवायला हवे होते… पण कुठे कमी पडतात प्रयत्न हे वेळ गेल्यावर विचार करून उपयोग नसतो कारण मागच्यांना पुढचा संघर्ष अटळ असतो.
आपण भूतलावर जगायला आलेलो असतो…ते जगून दाखवणं खरं यशस्वी खंबीर मनाचं लक्षण असतं…!
सुखी ठेवा, सुखी रहा, आनंद द्या, आनंद घ्या, अशीच विचारसरणी असावी..समजूतदारपणा आणि संयम, शांतता सतत सोबत ठेवावी..तेव्हाच दुःखाची तीव्रता कमी होत सुख आयुष्यात पाणी भरेन हे नक्की..!
सविता दरेकर

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

8 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

9 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

9 hours ago