कसारा घाटातून ‘लाल वादळा’ची आगेकूच
नाशिक : प्रतिनिधी
अखिल भारतीय किसान सभेतर्फे जमिनीचे हक्क, वनपट्टे आणि इतर प्रलंबित मागण्यासाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेने मार्च निघाला आहे. दिंडोरीतून निघालेला हा मार्च आता कसारा घाटातून मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होते आहे. ’आता माघार नाही, थेट मंत्रालय गाठणार’ असा पवित्रा किसान सभेने घेतला आहे. मोर्चातील शिष्टमंडळाची मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा निष्पळ ठरल्यानं 3 फेब्रुवारीला 20 हजारहून अधिक शेतकरी आणि शेतमजूर मुंबईत धडकणार आहेत.
राज्य सरकारने वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, वन जमीन आणि गायरानधारकांना स्वतंत्र सातबारा उतारे द्यावेत, शिक्षणाचे खासगीकरण थांबावं आणि पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी स्थानिक नागरिकांना द्यावं या मागणीसाठी माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय किसान
अखिल भारतीय किसान सभेतर्फे मार्चची सुरुवात दिंडोरी तालुक्यातून झाली आहे. यात दिंडोरीसह सुरगाणा, कळवण, चांदवड, नांदगाव, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी यासारख्या आदिवासीबहुल भागांतून हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत. मंगळवारी राज्य सरकारतर्फे मोर्चाच्या शिष्टमंडळाला मुंबईत मंत्रालयात चर्चेसाठी आमंत्रण दिलं आहे. शिष्टमंडळात डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, आमदार विनोद निकोले, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, सुभाष चौधरी, इंद्रजित गावीत, इरफान शेख, किरण गहला, सुनील मालुसरे, भिका राठोड आदींचा समावेश आहे.
अंमलबजावणीतील त्रुटींमुळे लाँग मार्च
2019 आणि 2023 मध्ये अशाच प्रकारचं लाल वादळ मुंबईच्या दिशेनं झेपावलं होतं. प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा झाली समिती नेमल्या गेल्या होत्या. पण केवळ आश्वासनं मिळालं. मात्र जमिनीचे प्रलंबित वनपट्टे आणि गायरान जमिनीचा सातबारा प्रत्यक्षात हातात न पडल्यानं आदिवासींचा व्यवस्थापनेवरचा विश्वास उडाला आहे. आश्वासनाच्या अंमलबजावणीतील त्रुटीमुळं हा तिसरा मार्च निघाला आहे, असं अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी सांगितलं.
March to hit Mumbai on February 3
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…