दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सुमारे वीस मिनिटे त्यांच्याशी चर्चा केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट का घेतली याचा खुद्द शरद पवार यांनीच पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्यात यावा, यासंदर्भात आपण पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच दोन दिवसांपूर्वी खा. संजय राऊत यांच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्याची घटना घडली. यासंदर्भातही आपण मोदी यांच्याशी बोलल्याचे शरद पवार म्हणाले. शरद पवार आणि मोदी यांची भेट दिल्लीत काल दुपारी झाली. मात्र, त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात होते. परंतु या चर्चांना खुद्द शरद पवार यांनीच पूर्ण विराम दिला.
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…
रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…
नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन…
हरकतींवरील सूचनांसाठीच्या कालावधीत मुदतवाढ नाशिक : प्रतिनिधी गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार…
सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…