दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सुमारे वीस मिनिटे त्यांच्याशी चर्चा केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट का घेतली याचा खुद्द शरद पवार यांनीच पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्यात यावा, यासंदर्भात आपण पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच दोन दिवसांपूर्वी खा. संजय राऊत यांच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्याची घटना घडली. यासंदर्भातही आपण मोदी यांच्याशी बोलल्याचे शरद पवार म्हणाले. शरद पवार आणि मोदी यांची भेट दिल्लीत काल दुपारी झाली. मात्र, त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात होते. परंतु या चर्चांना खुद्द शरद पवार यांनीच पूर्ण विराम दिला.
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…
अॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…
पिंपळगावच्या व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याची तब्बल 15…