दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सुमारे वीस मिनिटे त्यांच्याशी चर्चा केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट का घेतली याचा खुद्द शरद पवार यांनीच पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्यात यावा, यासंदर्भात आपण पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच दोन दिवसांपूर्वी खा. संजय राऊत यांच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्याची घटना घडली. यासंदर्भातही आपण मोदी यांच्याशी बोलल्याचे शरद पवार म्हणाले. शरद पवार आणि मोदी यांची भेट दिल्लीत काल दुपारी झाली. मात्र, त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात होते. परंतु या चर्चांना खुद्द शरद पवार यांनीच पूर्ण विराम दिला.
तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…
नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …
राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…
आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्यांच्या…