दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सुमारे वीस मिनिटे त्यांच्याशी चर्चा केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट का घेतली याचा खुद्द शरद पवार यांनीच पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्यात यावा, यासंदर्भात आपण पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच दोन दिवसांपूर्वी खा. संजय राऊत यांच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्याची घटना घडली. यासंदर्भातही आपण मोदी यांच्याशी बोलल्याचे शरद पवार म्हणाले. शरद पवार आणि मोदी यांची भेट दिल्लीत काल दुपारी झाली. मात्र, त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात होते. परंतु या चर्चांना खुद्द शरद पवार यांनीच पूर्ण विराम दिला.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…