नाशिकरोड

भरधाव ट्रकच्या धडकेने गर्भवती लेकीसह आईचा मृत्यू

नाशिकरोडची घटना; अतिक्रमणांमुळे गेला बळी

 

                                                         शीतल प्रेमचंद केदारे

                                                    सुनीता भीमराव वाघमारे

 

जन्मापूर्वीच बाळाचा मृत्यू
महापालिकेची बेपर्वाई
अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या बेपर्वाईमुळे नाशिकरोडला जन्माला येण्याच्या आधीच बाळाचा आणि मायलेकीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मुक्तिधाम मंदिरासमोरील अतिक्रमणाने वेढलेल्या धोकादायक रस्त्यावर मंगळवारी (दि. 19) सायंकाळी भरधाव ट्रकच्या धडकेत गरोदर महिला व तिच्या आईचा अंत झाला.
बिटकोकडून मालधक्का रोडकडे एक ट्रक (एमएच 04- ईएल 0446) भरधाव जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने होंडा सिटी कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या दोन रिक्षा उडवून थेट रस्ता ओलांडत असलेल्या आई व तिच्या गरोदर असलेल्या लेकीला धडक दिली. या अपघातात सुनीता भीमराव वाघमारे (वय 50, रा. नाशिकरोड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आठ महिन्यांची गरोदर असलेली त्यांची मुलगी शीतल प्रेमचंद केदारे (वय 27, रा. मखमलाबाद, नाशिक) गंभीर जखमी झाली. नागरिकांनी तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना शीतलचे बाळ दगावले आणि अखेर बुधवारी उपचारादरम्यान शीतलचाही मृत्यू झाला. प्रसूतीसाठी शीतल माहेरी आली होती. मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे झालेल्या या अपघातात आई-मुलगी आणि जन्माला न आलेल्या बाळाचा अंत झाला.

आणखी किती बळी घेणार?

या घटनेने संपूर्ण नाशिकरोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुक्तिधामसमोरील अतिक्रमणे हटवावीत, मालधक्का रोडवरील अवजड वाहतूक थांबवावी, रस्ता रुंद करावा आदी मागण्या नागरिक वर्षानुवर्षे करत आहेत; परंतु मनपा प्रशासनाला जाग येत नाही. वाहतुकीची कोंडी व वेगवान वाहनांमुळे नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. विना क्रमांकाचे डम्पर व अन्य वाहने पोलिसांसमोर जात असतानाही पोलीस परराज्यातील ट्रकचालकांकडून वसुली करण्यातच धन्यता मानत आहेत. मुक्तिधामशेजारी व बिटको थिएटरशेजारील रस्त्यावर अतिक्रमणांनी कळस गाठला आहे. प्रशासनाची बेपर्वाई आणखी किती बळी घेणार, असा सवाल संतप्त नागरिक करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आशिष गायकवाड पुढील तपास करत आहेत.

 

 

Editorial Team

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

6 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

6 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

6 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

6 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

6 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

7 hours ago