नाशिकरोड

भरधाव ट्रकच्या धडकेने गर्भवती लेकीसह आईचा मृत्यू

नाशिकरोडची घटना; अतिक्रमणांमुळे गेला बळी

 

                                                         शीतल प्रेमचंद केदारे

                                                    सुनीता भीमराव वाघमारे

 

जन्मापूर्वीच बाळाचा मृत्यू
महापालिकेची बेपर्वाई
अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या बेपर्वाईमुळे नाशिकरोडला जन्माला येण्याच्या आधीच बाळाचा आणि मायलेकीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मुक्तिधाम मंदिरासमोरील अतिक्रमणाने वेढलेल्या धोकादायक रस्त्यावर मंगळवारी (दि. 19) सायंकाळी भरधाव ट्रकच्या धडकेत गरोदर महिला व तिच्या आईचा अंत झाला.
बिटकोकडून मालधक्का रोडकडे एक ट्रक (एमएच 04- ईएल 0446) भरधाव जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने होंडा सिटी कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या दोन रिक्षा उडवून थेट रस्ता ओलांडत असलेल्या आई व तिच्या गरोदर असलेल्या लेकीला धडक दिली. या अपघातात सुनीता भीमराव वाघमारे (वय 50, रा. नाशिकरोड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आठ महिन्यांची गरोदर असलेली त्यांची मुलगी शीतल प्रेमचंद केदारे (वय 27, रा. मखमलाबाद, नाशिक) गंभीर जखमी झाली. नागरिकांनी तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना शीतलचे बाळ दगावले आणि अखेर बुधवारी उपचारादरम्यान शीतलचाही मृत्यू झाला. प्रसूतीसाठी शीतल माहेरी आली होती. मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे झालेल्या या अपघातात आई-मुलगी आणि जन्माला न आलेल्या बाळाचा अंत झाला.

आणखी किती बळी घेणार?

या घटनेने संपूर्ण नाशिकरोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुक्तिधामसमोरील अतिक्रमणे हटवावीत, मालधक्का रोडवरील अवजड वाहतूक थांबवावी, रस्ता रुंद करावा आदी मागण्या नागरिक वर्षानुवर्षे करत आहेत; परंतु मनपा प्रशासनाला जाग येत नाही. वाहतुकीची कोंडी व वेगवान वाहनांमुळे नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. विना क्रमांकाचे डम्पर व अन्य वाहने पोलिसांसमोर जात असतानाही पोलीस परराज्यातील ट्रकचालकांकडून वसुली करण्यातच धन्यता मानत आहेत. मुक्तिधामशेजारी व बिटको थिएटरशेजारील रस्त्यावर अतिक्रमणांनी कळस गाठला आहे. प्रशासनाची बेपर्वाई आणखी किती बळी घेणार, असा सवाल संतप्त नागरिक करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आशिष गायकवाड पुढील तपास करत आहेत.

 

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago