नाशिक : मानव तिदमे
अतिक्रमण काढण्याचा व्यापक उपक्रम नाशिक महापालिकेने कुंभमेळ्याआधी शहरातील मुख्य धार्मिक स्थळे आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचा मोठा अभियान सुरू केला आहे. विशेषतः रामकुंड, गोदाघाट आणि पाचवटी भागात. या भागातील दुकाने, तंबू, वेळेवर उभारलेले स्टॉल आणि इतर बेकायदा रचना हटविण्यात येत आहेत, जेणेकरून भाविकांना प्रवास आणि दर्शनात अडथळा येऊ नये. हे काम सुरू केल्यानंतर काही ठिकाणी विरोध झाली, पण पोलीस सुरक्षा आणि महापालिकेच्या अधिकार्यांनी पुन्हा मोहीम जोरात सुरू ठेवली आहे.
मुख्य मार्गांना स्वच्छ आणि मुक्त ठेवणे. महापालिकेने अशा प्रमुख वाहतूक व धार्मिक मार्गांवर अतिक्रमणविरोधी मोहीम वेगाने केली आहे. भक्त, साधूंच्या गर्दीसाठी वाहतूक सुकर करणे. रस्ता सुरळीत आणि सुरक्षित ठेवणे, कुंभमेळ्याच्या दिवशी अडथळ्यांशिवाय सुनिश्चित करणे. पायाभूत सुविधांची निर्मिती. कुंभमेळ्यासाठी फक्त अतिक्रमण हटवणे नाही तर महापलिकेने रस्ते, वाहतुकीचे मार्ग व सार्वजनिक सोयी-सुविधा सुधारणे यावरही काम सुरू केले आहे.
दीर्घकलीन योजना आणि कामांसाठी, महापालिकेने अतिक्रमण काढण्याच्या कामासाठी दीर्घकालीन मनुष्यबळ आणि साधनेदेखील तैनात केली आहेत, ज्यात विविध विभागांतील कर्मचार्यांचा समावेश आहे. हे काम आगामी दोन वर्षे सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Municipal Corporation’s encroachment eradication campaign before Kumbh Mela