नगरपालिका, नगरपंचायतींचे बिगुल वाजले आजपासून आचारसंहिता, 2 डिसेंबर रोजी मतदान

नगरपालिका, नगरपंचायतींचे बिगुल वाजले
आजपासून आचारसंहिता, 2 डिसेंबर रोजी मतदान
मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून, गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. न्यायालयाने 31 जानेवारीच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता पहिल्या टप्यात नगरपालिका नंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर महापालिका निवडणुका होतील असे सांगण्यात येत होते. काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.
2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.  राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेेबर
मतदान – 2 डिसेंबर
निकाल – 3 डिसेंबर
एकूण किती मतदार?
एकूण मतदार – 1 कोटी 7 लाख 3 हजार 576
महिला मतदार – 53 लाख 22 हजार 870

सात हजार खर्च

निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यानुसार नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी 15 लाखांची मर्यादा तर नगरसेवकपदासाठी 7 लाखांची खर्च मर्यादा ठरवण्यात आली आहे.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

10 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

10 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago