मुस्लिम कुटुंबाकडून घडतेय वारकऱ्यांची सेवा,दिंडीला १९ वर्षांपासून भोजन,चहा-नाश्त्याची व्यवस्था

टाकळी(विंचूर)येथील मुस्लिम कुटुंबाकडून घडतेय वारकऱ्यांची सेवा

लोणी खुर्द ते अंतापूर पायी दिंडीला १९ वर्षांपासून भोजन,चहा-नाश्त्याची व्यवस्था

लासलगाव:-समीर पठाण

अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील ओम शिव पार्वती पालखी दिंडी व भजनी मंडळाचे अध्यक्ष राजाराम आहेर यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या २१ वर्षांपासून लोणी खुर्द ते अंतापूर (दावल मलिकनाथ) अखंड रथ पालखी,पायी दिंडी सोहळा आणि रामनवमी वारी सुरू आहे.वारीदरम्यान टाकळी (विंचूर) (ता. निफाड) येथील मुस्लिम कुटुंबीयांकडून न चुकता दरवर्षी अखंड रथ पालखी व पायी दिंडीचे भावपूर्ण उत्साहात स्वागत करण्यात येते.एवढेच नव्हे तर या पायी दिंडीचा मुक्कामच या मुस्लिम कुटुंबीयांच्या घरी असतो.यावेळी शेख कुटुंबीयांकडून दिंडीतील वारकऱ्यांच्या मुक्कामासह सर्वांसाठी रात्रीचे भोजन व सकाळी चहा नाश्त्याची सोय करण्यात येते.

निफाड तालुक्यातील टाकळी (विंचूर) गावातील शेतकरी कुटुंबातील नजीर अहेमद शेख,फातेमा नजीर शेख हे दाम्पत्य मागील १९ वर्षांपासून लोणी खुर्द ते अंतापूर (दावल मल्लिकनाथ) अखंड रथ पालखी व पायी दिंडी सोहळा आणि रामनवमी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मनापासून सेवा करत असतात.या धार्मिक कार्यात त्यांना त्यांचा मुलगा राजमहंमद नजीर शेख,सून यास्मिन राजमहंमद शेख,नातू वसीम राजमहंमद शेख, नातसून मुस्कान वसीम शेख यांचीही साथ मिळत असते. पायी दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था हे कुटुंबीय स्वतः करतात.

या वेळी सुध्दा सुमारे २०० वारकऱ्यांना शेख कुटुंबीयांनी बाजरीची भाकरी,पोळी,पातवड्याची काळ्या मसाल्यातील भाजी,भात आणि गोड शिऱ्याचे भोजन देऊन तृप्त केले.तसेच सकाळचा चहा-नाश्ता जिगर खान यांच्याकडून देण्यात आला.या पायी दिंडीत यंदा ५८ पुरुष, ३० महिला,तर १३ बालगोपाळांसह १०१ वारकरी सहभागी झाले आहेत.

टाकळी विंचूर येथील राजमहंमद शेख हे गरीब शेतकरी कुटुंब मुस्लिम असेल तरी गेल्या १९ वर्षांपासून लोणी खुर्द ते अंतापूर दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करून सामाजिक एकोपा ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.पायी दिंडीत कोणत्या देवाला भजतात,याचा विचार न करता माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ मानून मुस्लिम शेख कुटुंबीय वारकऱ्यांची सेवा करतात ही अभिनंदनीय बाब आहे.

वेदिका होळकर,
अध्यक्षा,महिला दक्षता समिती,लासलगाव.

वारकऱ्यांना लोणी खुर्द ते अंतापूर (दावल मल्लिकनाथ) पोहोचण्यासाठी शेकडो किमी अंतर चालावे लागते. माझ्या आई-वडिलांनी गेल्या १९ वर्षांपासून वारकऱ्यांच्या मनात ऊर्जा निर्माण करण्यासाठी पायी दिंडीचे स्वागत करून सेवेचे काम करत असल्याचे आम्ही बघितले आहे. त्यांनी सुरू केलेली ही उज्ज्वल परंपरा अखंडित सुरू ठेवणार आहे.

राज महंमद शेख,टाकळी-विंचूर

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago