नाशिक प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या गोदावरी प्रदूषण नियंत्रण आढावा बैठकीत नाशिकमधील नद्यांसाठी भरीव काम करणारे चंद्रकिशोर पाटील यांना आमंत्रित करण्यात आले.
चंद्रकिशोर पाटील यांच्या कार्याचा पंतप्रधान श्री नरेंद मोदी यांनी मन कि बात या कार्यक्रमात स्वछाग्रही म्हणून गौरव केला आहे.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांच्या कामाची माहिती घेतली. उंटवाडी येथील नंदिनी नदीच्या पुलाजवळ शिट्टी मारून लोकांना नदीपात्रात कचरा टाकण्यापासून परावृत्त करण्याच्या त्यांच्या कामाची विशेष दखल घेतली गेली आहे.
यावेळी श्री गमे यांनी महानगर पालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना श्री पाटील यांचा नाशिकचे स्वच्छतादुत म्हणून 26 जानेवारी रोजी सन्मान करण्याची सूचना दिली गेली. या बैठकीला माननीय जिल्हाधिकारी श्री गंगाथरन ,जिल्हा परिषद CEO अशिमा मित्तल,स्मार्ट सिटी CEO सुमंत मोरे ,सर्व विभागाचे अधिकारी व राजेश पंडित व मान्यवर उपस्थित होते.