नाशिक

शीतलहरींमुळे नाशिककर गारठले

नाशिक:प्रतिनिधी

उत्तर भारतातून येणार्या शीतलहरीमुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. काल दिवसभर वातावरणातील  गारव्यामुळे नागरिक थंडीने गारठून गेले.  गुरूवारची (दि.15) पहाट उजाडली तीच दाट धुके घेऊन.शहरावर दाट धुक्याची चादर आच्छादलेली होती. शहरात गेल्या काही  दिवसापासून  थंडीचा कडाका वाढला आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत तर सुर्यदर्शनही झाले नाही ..त्यात दिवसभर वातावरणात गारवा होता .. तर संध्याकाळी 6 वेळेनंतर परत वातावरणात धुके निर्माण झाले होते.. परिणाम  थंडीने नाशिककर चांगलेच गारठले आहेत.शहरात सातत्याने वातावरणात बदल होत आहे.  शहरातील नागरिकांसाठी धुक्याची वेगळी गंमत असली तरी शेतकर्‍यांची मात्र धाकधूक वाढली आहे. उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे वातावरणात गारवा आणि थंडी वाढली आहे.

मात्र, दाट   धुके पडल्याने नागरिक  मनमोहक अशा धुक्याचा आनंद घेताना दिसली . काल अधिकच दाट धुके पडले होते. पहाटेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत धुके होते. तोपर्यंत चांगलचा गारठा जाणवत होता.

गंगापूर रोड,उपनगर,नाशिक रोड,इंदिरा नगर, सातपूर, अंबड, पाथर्डी फाटा यासह शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धुके पडले होते.हिवाळ्यात नाशिक शहरात दरवर्षी दाट धुके पडते. पण यंदा सातत्याने वातावरणात बदल होत आहे. शहरात दाट पडलेल्या धुक्यात जॉगींगसाठी आलेल्या नाशिककरांनी चहा टपर्यावर गर्दी केली होती .तर अनेकांनी धुक्यामध्ये फोटो काढत सोशल मिडीयावर अपलोड केले. नाशिककर धुक्याच्या दुलाईचा आनंद घेताना दिसत होते.

थंडीत खाद्य पदार्थाचा आस्वाद

थंडी वाढल्याने थंडीपासून बचावासाठी  अनेक जण वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यात खवय्ये मात्र थंडीचा आस्वाद घेत असतानाच कुरकुरीत भज्जी चा आस्वाद घेत आहेत. चहा आणि गरम भज्जी असे थंडी विसरायला लावणाऱ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यात नाशिककर दंग असल्याचे चित्र आहे.

दिवसभर स्वेटरमध्येच वावर

यंदाच्या वर्षी थंडीचा कडाका जाणवत नव्हता .मात्र जानेवारीच्या सुरूवातीपासूनच दिवसेंदिवस थंडीत वाढ होत आहे.  त्यात काल दिवसभर थंडीत धुके ही असल्याने वातावरणात अधिक गारठा होता .त्यामुळे नाशिककरांनी  दिवसभर गरम कपडे परिधान केल्याचे चित्र होते.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago