थंडीचा कडाका वाढल्याने नाशिककर आजारी




नाशिक : प्रतिनिधी

शहरातील वातावरणात मागील काही दिवसापासून सातत्याने बदल होत आहे. थंड वारे, गारवा, दाट धुके या बदलामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकल्यासह साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. शहरातील रूग्णालयात रूग्नांची संख्या वाढत आहे. वातावरण सतत बदलत असल्याने ताप, डोके दुखी, अंग दुखणे, सर्दी, खोकला, वात विकार, हाडे दुखणे इत्यादी आजार वाढले असल्यामुळे रुग्णालयात नेहमीपेक्षाही अधिक गर्दी होत आहे. शहरातील तापमानातही सतत चढ उतार होत आहेत. कालचे शहरातील किमान 10.3 अंश तापमान इतके तर कमाल 21.5 अंश तापमान नोंदवले गेले. सततच्या वातावरणातील बदलामुळे आरोग्याची काळजी नागरिकांना कठीण जात आहे. वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे.
परिणामी शहरातील रूग्णालयात थंडी ताप, सर्दी खोकल्याच्या रूग्णांची संख्या वाढली चांगलीच वाढली आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केले आहे.

शहरात सकाळी आणि संध्याकाळी कडाक्याची थंडी असते तर दुपारी मात्र उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. त्यामुळे वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिराम होत आहे. यंदाच्या वर्षीचा थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. त्यात पाच राज्यात थंडीचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे थंडी अधिक वाढण्याचा अंदाज असल्याने वाढत्या ्थंडीत आरोग्याची काळजी घेण्याचे नागरिकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.


थंडीत अशी घ्या आरोग्याची काळजी

थंडीत पौष्टिक आहार हवा त्याचबरोबरच फलाहार, सुकामेवा हे उपयुक्त ठरेल. नियमित व्यायाम, वॉर्निंग वॉक निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. शीतपेय, शिळे पदार्थ, उघड्यावरचे खाणे टाळावे. या काळात शरीरातील जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने भूक लागते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा आहार सेवन करा.

   हवामानातील बदलामुळे या दिवसांत शीतपेय, शीतपाणी पिणे टाळा, तसेच वातानुकूलित यंत्रणांचा वापर करणे टाळा.थंडीत बाहेर पडताना गरम कपड्यांचा वापर करा. तसेच आरोग्या संबंधी तक्रार जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या.

डॉ. पल्लवी बाविस्कर 



Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

19 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

21 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago