नाशिक : प्रतिनिधी
नाशकातून देशात नियमित आणि विनाखंड विमान वाहतूक सुरु राहावी तसेच विदेशातही ही सेवा सुरू करण्याच्यादृष्टीने संबंधित सर्व यंत्रणा आणि संघटनांनी एकजुटीने प्रयत्न करावे तसेच त्यासाठी नाशिकचे ब्रँडिंग करावे,असे आवाहन आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी केले.
नाशकात विमानसेवा पुरविणार्या कंपन्यांसोबत यासेवेचे व्यापक जाळे येथे विणले जावे तसेच नाशकातून दिल्ली,मुंबई, हैदराबाद,चेन्नई, तिरुपती,अहमदाबाद,गोवा,नागपूर व अन्य शहरांशी एअर कनेक्टिव्हिटी कायमस्वरूपी व विनाखंड सुरू राहावी या संदर्भात फेब्रुवारीत बैठक होणार असून त्यात सादर करावयाच्या रोडमॅप संदर्भात चर्चा करण्यास विविध औद्योगिक आणि संलग्न संघटनांच्या पदाधिकारी आणि प्रतिनिधींची बैठक आयामाचयस रिक्रिएशन सेंटर येथे पार पडली त्यावेळी मार्गदर्शन करतांना निखिल पांचाळ बोलत होते.
निमाचे नूतन अध्यक्ष धनंजय बेळे,तानचे सागर वाघचौरे, मनोज वासवानी,क्रेडाईचे सचिन चव्हाण, कुणाल पाटील,नीटाचे ऋषिकेश वडाळकर नाशिक सिटीझन फोरमचे सचिन अहिरराव,चेंबरचे संजय सोनवणे,आयमाचे उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे,सहसचिव गोविन्द झा, खजिनदार राजेंद्र कोठावदे,एव्हीएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावळ, ज्ञानेश देशपांडे, संदीप देसले, अमित कुलकर्णी आदी व्यासपीठावर होते.
नाशिकहून पूर्ण क्षमतेने देश आणि विदेशात विमानसेवेचे व्यापक जाळे विणले जावे यासाठी सर्व संघटनांनी,नागरिकांनी, तसेच व्यावसायिकांनी त्याचे ब्रँडिंग करावे,ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावून त्याची व्यापक प्रसिद्धी करावी.लोकांना विमानतळावर विनाविलंब आणि वेळेत पोहोचता यावेत यासाठी शहराच्या कानाकोपर्यातून बससेवेचे जाळेही विणले जावेत,असेही निखिल पांचाळ यांनी सांगितले.
विमान कंपन्यानी उत्तम सेवा दिल्यास नाशकातील सर्व संघटना त्या कंपन्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करतील,असे मत निमाचे नूतन अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…