नाशिक

इच्छुकांच्या अपेक्षांना पुन्हा एकदा धुमारे

नाशिक : प्रतिनिधी
न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचेनिर्देश दिल्यानंतर अंतिम प्रभागरचना शनिवारी जाहीर करण्यात आली. तीन सदस्यीय प्रभाग कायम ठेवण्यात आल्यामुळे पूर्वीचीच रचना कायम राहणार आहे. प्रभागरचना जाहीर झाल्यामुळे इच्छुकांच्या थंडावलेल्या हालचालींना पुन्हा वेग येण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेची मुदत संपल्यामुळे निवडणुका जाहीर होण्याची चिन्हे दिसत असतानाच, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून निवडणुका लांबणीवर पडल्या. निवडणुकांच्या तयारीला लागलेल्या इच्छुकांमध्ये त्यामुळे काहीसा हिरमोड झाला होता. अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांशी संपर्क अभियान सुरू केले होते. तर काहींनी संपर्क कार्यालये उघडून जनतेचे प्रश्‍न, अडचणी सोेडविण्यासाठी संपर्क कार्यालयातच ठाण मांडले होते. काहींनी निवडणुकीच्या तोंडावर प्रभागामध्ये विकासकामांच्या उद्घाटनाचा आणि भूमिपूजनाचा धडाकाच लावला होता. पण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या. परिणामी, आता सहा महिने तरी निवडणुका होत नाही, अशी शक्यता गृहीत धरून इच्छुकांच्या हालचाली थंडावल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज सकाळी गुड मॉर्निंगचे पाठविण्यात येणारे मेसेजही काहींनी बंद करून टाकले. मात्र, आता प्रभागरचना जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षांना पुन्हा एकदा धुमारे फुटले आहेत.
एका प्रभागात तीन उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. त्यामुळे आता मागील इच्छुकांना तयारीसाठी नव्याने वेळ मिळाला आहे. प्रभागरचनेमध्ये फारसे बदल झालेले नसल्याने इच्छुकांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाशी युती अथवा आघाडी होते की स्वबळावर निवडणूक लढविली जाते, यावर इच्छुक डोळा ठेवून आहेत. राज्यात भोंग्यांच्या प्रश्‍नावरून राजकारण तापलेले आहे. त्यातच मध्यंतरी पक्ष प्रवेशाचे सोहळे चांगलेच रंगू लागले होते.  स्वपक्षात राहून निवडून येण्याची शक्यता मावळल्याने अथवा तिकीट मिळण्याची खात्री नसल्याने काहींनी इतर पक्षामध्ये प्रवेश करण्याचे ठरविले होते. तथापि, त्यालाही नंतरच्या काळात ब्रेक बसला होता. आता पुन्हा एकदा नव्याने गणिते मांडली जाणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

9 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

9 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

10 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

10 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

10 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

10 hours ago