शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा  आंदोलनाचा इशारा


प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील अकृषी विद्यापीठय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी विविध प्रलंबित प्रश्‍नांच्या सोडवणुकीच्या संदर्भात 2 फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्या विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. तसेच 14 फेब्रुवारी रोजी निदर्शने, 15 फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम करणे, 16 फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप, तर 20 फेब्रुवारी रोजी सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयाचे बेमुदत बंद अशी आंदोलनाची रूपरेषा असल्याचे महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे महासचिव रावसाहेब त्रिभूवन यांनी दिली . यावेळी दिलीप बोंदर, रमेश पवार, श्री.खैरनार, डॉ.हेमंत भावसार, श्री. धोंडोपंत गवळी आदी उपस्थित होते.
यापुर्वी 18 डिसेंबर 2021 रोजी शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी मागण्यासंदर्भात 11 दिवस काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर तात्कालिन उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र केवळ चर्चा व आश्‍वासनाशिवाय काहीच होऊ शकले नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांमध्ये असंतोष असल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago