नाशिक

त्र्यंबकेश्वर, इगतपुरीत जनजीवन विस्कळीत

दोन दिवसांपासून संततधार; रस्त्यांची दैना, भात लागवडीत शेतकरी व्यस्त

इगतपुरी : खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करताना विद्यार्थी व नागरिक.
शहरात पसरली धुक्याची चादर.

त्र्यंबकेश्वर : शेंडेपाड्याजवळील अपूर्ण पुलामुळे चालकांची कसरत.

पुलाच्या कामामुळे तयार केलेला पर्यायी रस्ताही वाहून गेला.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर, इगतपुरी शहरासह तालुक्यात बुधवारी सायंकाळपासून संततधार सुरू आहे. गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झालेे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था पावसाने उघड केली. इगतपुरी तालुक्यात सलग दोन दिवसांपासून पडणार्‍या संततधार पावसामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. शेतकरी भात लागवडीसाठीच्या कामात व्यस्त झाला आहे.

त्र्यंबकेश्वर : संततधारेमुळे नदी-नाल्यांंना पूर आला असून, हरसूलजवळच्या शेंडेपाडा गावाजवळ ठाणापाडा- हरसूल रस्त्यावर पुलाचे काम अपूर्णावस्थेत आहे. वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. नव्याने केलेल्या पुलावरून जाण्याचा प्रयत्न करणारी वाहने भरावात अडकली. हरसूल भागातील 38 गावांना जोडणार्‍या रस्ताकामातील दिरंगाईने बंद पडल्याचे दिसून आले. गुरुवारी पावसाने आलेल्या पुरात येथे भयावह परिस्थिती निर्माण झाली. नव्याने बांधलेला पूल अद्याप वापरात आलेला नाही. वीजवाहिन्यांची उंची कमी असल्याने पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे झाले आहे. याबाबत तांत्रिक कारण देत सारवासारव केली जात आहे. तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्र, भूस्खलन होईल अशा डोंगर टेकड्यांवरील वस्तीच्या बाबत तहसील कार्यालयाने काय खबरदारी घेतली हे समजण्यास मार्ग राहिलेला नाही. पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणांची बैठक घेणे, संभाव्य आपत्तीबाबत दक्षता घेणे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
त्र्यंबकला गटारांचे पाणी रस्त्यावर
त्र्यंबकेश्वर शहरात गंगासागर तलावाच्या बाजूला असलेल्या ओहळाचे व गटारांचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. मेन रोडच्या उजव्या बाजूच्या रस्त्यावर आलेले गढूळ आणि दुर्गंधीयुक्त आहे, नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण करणारे आहे. या रस्त्यावरून त्र्यंबकेश्वराची पालखी जाते. येथून भाविक 200 रुपये तिकीट घेण्यासाठी कुशावर्तावर आणि तेथून पुन्हा दर्शनासाठी मंदिराकडे ये-जा करताना या घाणीच्या पाण्यात पाय बुचकळत वाट काढताना दिसत आहेत. तेली गल्लीतदेखील गटाराचे पाणी तुंबल्याने रस्त्यावरून वाहत ते मेनरोडच्या डाव्या बाजूच्या रस्त्यावर आले आहे. याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
इगतपुरीत जोरदार पाऊस
इगतपुरी : पावसाचे माहेरघर ओळखल्या जाणार्‍या इगतपुरी तालुक्यात तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग दोन दिवसांपासून संततधारेमुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. शेतकरी भात लागवडीसाठीच्या कामात व्यस्त झाला आहे. पावसामुळे बाजारात शुकशुकाट जाणवत होता. शहरात नळकनेक्शनसाठी रस्ता खोदून ठेवल्याने या खड्ड्यांत पाणी साठत असल्याने चालताना अनेक विद्यार्थी खड्ड्यात पडले. पावसामुळे काही ठिकाणी वीजपोल पडले, तर काही ठिकाणी वायर तुटल्याने शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक भागात नगर परिषदेला पाणीपुरवठा करता न आल्याने भरपावळ्यात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नाही. महावितरणच्या कर्मचार्‍यांकडे पुरवठा सुरळीत करण्यासाठी पुरेशी साधनसामग्री नसल्याने त्यांनाही वीजपुरवठा सुरू करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे नाशिक व मुंबईला जाणार्‍या चाकरमान्यांंचे हाल झाले. पावसामुळे शेतकरीवर्गाने भातलागवडीला सुरुवात केली. भात पेरणीला वेग आला आहे.दरम्यान, मानवेढे, पिंपरी, भावली नांदगावसदो, तळेगाव, चिंचलेखैरे, कराची वाडी, आंबेवाडी, जामुंडे, घोटी, गोंदेदुमाला, वाडीवर्‍हे आदी भागात जोरदार वार्‍यासह पाऊस होत असून, जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. पावसामुळे डोंगरावर, नदी-नाले, झरे आदी ओसंडून वाहत आहेत. महामार्गावरील कसारा घाट व महामार्ग धुक्यात हरवला आहे. मुंबईहून नाशिककडे जाणार्‍या व येणार्‍या वाहनचालकांना भरदिवसा धुक्यामुळे हेडलाईट लावून वाहन चालवताना घाटात कसरत करावी लागत असून, संथगतीने प्रवास करावा लागत आहे. शहरात धुक्याची चादर पसरली आहे.

Gavkari Admin

Recent Posts

कॅम्पस लूकसाठी स्टाइलिश टच-अप्स

कॉलेजच्या रंगीत दिवसांची स्टाइल डायरी तरुणींनी कॉलेज कॅम्पसचा लूक सहज, स्टायलिश आणि व्यक्तिमत्त्वसंपन्न ठेवायचा असेल,…

8 hours ago

पाऊस

पाऊस दरवर्षीच पडतो; पण प्रत्येकाचा पाऊस निराळा असतो. कुणाला तो बालपणात घेऊन जातो, कुणाला कॉलेजवयीन…

8 hours ago

भारतीय वैज्ञानिकाचा थक्क करणारा शोध

ष्टीच्या आरंभापासूनच मानवाच्या कल्पनाशक्तीला गोंधळात टाकणारे, विस्मयकारी आणि अनंत अशा अंतराळाचे गूढ अजूनही वैज्ञानिकांच्या अभ्यासाचा…

8 hours ago

वनाधिकारी ते अरण्यऋषी

निसर्ग चैतन्यमय आहे, सारे अरण्य म्हणजे एक प्राणमय जीव आहे, त्याला त्याचे स्वतंत्र व्यक्तित्व आहे,…

8 hours ago

नाशिकरोडला झाडे उन्मळली, वालदेवीला पूर

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी संततधारेमुळे नाशिकरोड व परिसरात जनजीवन विस्कळीत झाले होते. पाच ते सहा…

8 hours ago

नाशिकरोड रेल्वेस्थानकात महिलांसाठी ‘शांती आलय’

एअरपोर्ट शैलीतील आसनव्यवस्था; प्रतीक्षालयाला नवे रूप नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी भुसावळ विभाग, मध्य रेल्वे यांनी…

8 hours ago