अरे संसार संसार ते जागर शिवबाचा!

मराठी बोलींच्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक ः प्रतिनिधी
चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक येथे होत आहे. या संमेलनाच्या पूर्वसंध्येला काल महाकवी कालिदास कलामंदिरात मराठी बोलींचा महोत्सव पार पडला. या महोत्सवात ‘अरे संसार संसार’पासून ते ‘जागर शिवबा’चापर्यंत बोलीभाषेतील कार्यक्रम सादर करण्यात आले. या महोत्सवास नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
चौथे विश्व मराठी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर काल सकाळी बोलीभाषांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. जळगाव येथील परिवर्तन संस्थेने शंभू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बहिणाबाईंची गाणी व कविता यावर आधारित ‘अरे संसार संसार’ हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत ‘वन्स मोअर’ची मागणी केली. या कार्यक्रमातून अहिराणी गीतांचे दर्शन घडविण्यात आले. तसेच श्री. पाटील यांनी जीवनात बोलीभाषेचे महत्त्व विशद केले.
बोहाडा नृत्य प्रकार नाशिकचे शाहीर प्रवीण जाधव आणि सहकार्‍यांनी सादर केला.
पुष्पा ठाकूर, राणी कुमावत, माणिक कुमावत आणि सहकार्‍यांनी अहिराणी गीते, तर विदर्भातील नाट्य प्रकार असलेला ‘झाडीपट्टी’ हा प्रकार नरेश गडेकर व सहकार्‍यांनी सादर केला. विशाल शिंगाडे व त्यांच्या सहकार्‍यांनी ‘आराधी’ लोकनृत्य आणि लोकगीते सादर केली. अखिल भारतीय साहित्य परिषद शाखा, धाराशिव निर्मित आराधी लोकनृत्य आणि लोकगीतांमध्ये श्रीकृष्ण गीत, वासुदेवाचे पहाटेचे भक्तिगीत, विठू माउली गीत, खंडोबाचा जागर, वाघ्या मुरळी गीत, देवीचा जागर आदी गीते सादर केली.
प्रवीण जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा, बालपण, विविध गुणांचा व कार्याचा पैलू दाखवणारे पोवाडा, गीत सादर केले.
या कार्यक्रमांना दिवसभर उपस्थित राहून नाशिककरांनी उत्स्फूर्त दाद दिली.

Oh world, world, the awakening of Shiva!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *