कांदा प्रश्र्नी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत कुठलाही तोडगा नाही.

कांदा प्रश्र्नी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा नाही.

लासलगाव:समीर पठाण

कांदा प्रश्नावर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढविल्या प्रकरणी मंगळवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा व निवडक बाजार समित्यांचे सभापती,सचिव व नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोशिएशनचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.ही बैठक अवघ्या दहा मिनिटात संपन्न झाली मात्र या बैठकीतूनही कुठलाही तोडगा निघालेला नसल्याचे कळते.

भारताच्या विविध ठिकाणी बॉर्डरवर सुमारे २१ हजार टन कांदा अडकलेला आहे तो विदाऊट ड्युटी सरकारने सोडावा यानंतर आम्ही निर्णय घेणार असल्याची भूमिका या वेळी व्यापाऱ्यांनी घेतली आहे जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत लिलाव बंद राहील असा इशारा देखील देण्यात आला आहे.

राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंढे आणि अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ यांचेशी लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दुरध्वनीवरून कांदा निर्यात शुल्क बाबत चर्चा करून सविस्तर माहिती दिली होती त्याअनुषंगाने जिल्ह्यातील निवडक बाजार समित्यांचे सभापती,सचिव व नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोशिएशनचे प्रतिनिधी यांची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे निर्देश कृषि मंत्री धनंजय मुंढे यांनी दिले होते

दरम्यान मंगळवारी देखील लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारावर शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा लिलाव साठी आणला नाही त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.लासलगाव बाजार समिती सह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या बंद असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांचे देखील मोठे आर्थिक नुकसान होत आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

महापालिकेला एक लाख वृक्ष लागवडीचे टार्गेट

प्रधान सचिवांची ऑनलाइन आढावा बैठकीत सूचना नाशिक : प्रतिनिधी शहरात पन्नास लाखांची वनसंपदा असल्याचे सहा…

13 hours ago

48 सोनोग्राफी केंद्रांची झाडाझडती

भरारी पथकांकडून शहरात धडक मोहीम नाशिक : प्रतिनिधी शहरातील गंगापूर रोडवरील पंड्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदानाचा…

13 hours ago

बत्तीस कोटींचे यांत्रिकी झाडू पावसाळ्यात फेल

वर्षभरात 55 हजार किमी रस्ते सफाईचा दावा; आता चार महिने बंद नाशिक ः प्रतिनिधी गुजरातमधील…

13 hours ago

मुलींनो, खंबीर व्हा..

प्रत्येक मुलीचे जीवनातील महत्त्वाचा क्षण म्हणजे, ज्यावेळी ती सासरी जाते. ज्या घरात ती वावरली, हसली,…

14 hours ago

रागावर नियंत्रण हीच आत्मविकासाची पहिली पायरी

राग ही माणसाच्या मनाची एक सहज आणि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. प्रत्येकालाच राग येतो. कारण सगळं…

14 hours ago

हुंडा की संस्कारांची शिदोरी?

आपलंच खाऊन आपल्याच जीवावर मोठे होणारे एक दिवस आपल्यालाच संपवायला मागे-पुढे बघत नाहीत. म्हणून नेहमी…

14 hours ago