कांदा निर्यात शुल्क लादल्याच्या निषेधार्थ शेतकरी हितासाठी राज्यातील बाजार समित्यांमध्ये लाक्षणिक बंद पाळा – जयदत्त होळकर

लासलगाव। प्रतिनिधी

गेली कित्येक दिवस कवडीमोल भावाने कांद्याची विक्री सुरू होती. अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले होते.आत्ता गेल्या पंधरा दिवसापासून कुठेतरी कांद्याला थोडा फार भाव मिळत असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार असल्याने शेतकरी हितासाठी बाजार समितीच्या सर्व घटकांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये आज सोमवारी लाक्षणिक बंद पाळावा असे आवाहन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
कांद्याचे दर २ हजार रुपयांच्या पुढे गेले की हे दर कमी कसे करता येतील यासाठी केंद्र सरकार अतिशय तत्परतेने निर्यात शुल्क लादून किंवा निर्यात बंदी सारखे निर्णय घेऊन हे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत शेतकऱ्यांना हेतू पुरस्कार त्रास देण्याचे काम करत असल्याचा आरोप होळकर यांनी केला आहे. लाल कांद्याच्या बाबतीत देखील अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी राज्य सरकारने ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान शेतकऱ्यांना जाहीर केले होते. ते अनुदान शेतकऱ्यांना अजूनही मिळालेले नाही.
उन्हाळ कांदा सुरुवातीला बाजारात आल्यानंतर केवळ तीनशे ते चारशे रुपये प्रतिक्विंटल दराने तो विक्री करावा लागला होता शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणे अवघड झालेले होते अशा परिस्थितीत चाळीत साठवलेला कांदा सध्या बाजारपेठेत विक्रीला आणला जात आहे याच कांद्याला १५०० ते १६०० भाव सध्या शेतकऱ्यांना मिळत असताना केंद्र सरकारने अत्यंत चुकीचा निर्णय घेऊन निर्यात शुल्क ४० टक्के पर्यंत वाढवल्याने आपोआपच निर्यातीला त्याचा फटका बसणार असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या बाजारभावावर होणार आहे.
शेतकरी हितासाठी बाजार समितीच्या सर्व घटकांनी यामध्ये व्यापारी व माथाडी कामगार, हमाल यांनी आपली एकजूट दाखवावी व सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लाक्षणिक बंद सोमवारी पाळावा असे आवाहन यावेळी जयदत्त होळकर यांनी केले आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

21 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

21 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

21 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

21 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

21 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

21 hours ago