महाराष्ट्र

पाण्यासाठी जीव धोक्यात

दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची वेळ

इगतपुरी : वार्ताहर
एकीकडे शासन आदिवासी बांधवांना सर्व सुविधा देण्याची घोषणा करीत असताना, मात्र प्रत्यक्षात त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याचे ताजे उदाहरण म्हणजेच इगतपुरीतील कथरुवंगण पाड्यातील आदिवासी महिलांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुर्दैव म्हणजे धोकेदायक अशा रेल्वे क्रॉसिंग करून 2 ते 3 टेकड्या चढत जवळपास दोन कि.मी. पाण्यासाठी भटकंती करूनदेखील अतिशय दुर्गंधीयुक्त हॉटेल व्यावसायिकांनी वापरलेले पाणी पिण्याची वेळ या आदिवासी बांधवांवर
आली आहे.
या समस्येला येथील महिला, मुली मेटाकुटीला आल्या आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी या आदिवासी बांधवांची निव्वळ बोळवण करीत असल्याने पाणी मागायचे तरी कुणाकडे, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या पाड्यात एकूण 45 घरे आहेत. ज्यात जवळजवळ 200 लोकवस्ती करून राहतात. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली नगर परिषदेने सात वर्षांपूर्वी दोन नळकनेक्शन दिले. जवळच एका जुन्या टाकीत हे पाणी साठवले जाते. पंधरा दिवसांत एक वेळा जास्तीत जास्त वीस मिनिटे पाणीपुरवठा केला जातो, असे येथील आदिवासीबांधव सांगतात.सध्या तेही मिळत नसल्याचे सांगण्यात आले. मागील काही दिवसांपासून येथे तळेगाव येथील विहिरीतून पाणी सोडण्यात येते. मात्र, हे पाणी गढूळ, उंदीर व साप मेलेले आणि केस असलेले पाणी पुरविण्यात येत असल्याचे महिलांनी सांगितले.

 

उत्तर महाराष्ट्रासह मुंबईसारख्या महानगराची तहान भागवणारा हा इगतपुरी तालुका आज स्वतःच पाण्याविना व्याकूळ झालेला आहे. इगतपुरीतील काही गावांची, पाड्यांची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहे. कधी गढूळ तर कधी दुर्गंधीयुक्त पाणीच नशिबाला येते. येथील पाड्यांची अवस्था येथील स्थानिक प्रशासन चांगलेच जाणून आहे. मात्र, ही अवस्था पालटायला काहीच प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. यांचा पाण्याचा वनवास कधी संपणार, हाच प्रश्‍न आहे.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago