श्री कालिका मंदिरात नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग

नाशिक :प्रतिनिधी

नाशिकचे अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात दि .२६ सप्टेंबर ते ५आॅक्टो २०२२या दरम्यान यात्रौत्सोव होत असून या यात्रात्सोव काळात भाविकांना मनोभावे देवदर्शन करता यावे यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती  श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवराव(आण्णा)पाटील यांनी दिली.
अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिर परिसरात होणा-या यात्रौत्सोवाच्या नियोजनासंदर्भात आण्णा पाटील यांच्यासह पोलिस उपायुक्त अमोल तांबे सहायक पोलिस आयुक्त दिपाली खन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासुन कोरोनामुळे निर्बंध होते.यंदा तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा कालिका मंदिरात नवरात्रीच्या निमित्ताने यात्रात्सोव होणार आहे . यात्रेच्या काळात भाविकांना सुखकर देवदर्शन घेता यावे तसेच आगामी काळात होणार्‍या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यामुळे मंदिर प्रशासनाच्या वतीने भव्य दिव्य असा वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात येणार आहे. त्याच बरोबर देवीदर्शन घेण्यासाठी येणाऱ्या महिला आणि पुरुष भाविकांच्या स्वतंत्र रांगा करण्यासाठी बँरेकेटिंग करण्यात आली आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी मंदिराच्या दोन्हीही मुख्य प्रवेशद्वारावर २४तास महिला व पुरुष बाऊन्सर ठेवण्यात येणार आहेत. यात्रौत्सोव काळात मंदिराच्या प्रांगणात २४तास प्रथमोपचार केंद्र सुरु रहाणार आहे .  कालिका देवी मंदिरात नवरात्रीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात्रौत्सोव काळात भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी २४तास सुमारे २००हुनअधिक स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे . तसेच मोठ्या प्रमाणावर विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे लाईट गेल्यास तात्काळ जनरेटरची देखिल व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ज्या भाविकांना तात्काळ देवी दर्शन घ्यायचे आहे.अशा भाविकांनासाठी तात्काल दर्शन सुविधा देखील मंदिर संस्थानच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंदिराच्या प्रांगणात भव्य दिव्य असे सुमारे ५०खोल्या असलेले सर्व सुविधांयुक्त भक्तनिवास उभारले आहे. या भक्तनिवासात उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील यात्रेकरू भाविकांसह पर्यटक तसेच नाशिक शहरात विविध व्यांधीवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्नांसह त्यांच्या नातेवाईकांना रहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  यात्रेोत्सवात काळात जास्तीत जास्त भाविकांनी देवीदर्शन व्हावे यासाठी २४तास मंदिर सुरु रहाणार आहे. यात्रौत्सोवकाळात देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा २ कोटी रुपयांचा विमा काढण्यात येणार आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

5 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

6 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

6 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

6 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

6 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

6 hours ago