नाशिक

मुक्त विद्यापीठात आजपासून रायला महोत्सव

 

 

जिल्ह्यातील २ आश्रमशाळांचा समावेश; १०० विद्यार्थी होणार सहभागी

 

 

 

नाशिक : ग्रामीण आदिवासी भागातील मुलांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळावी या उद्देशाने  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठात ‘रायला महोत्सव २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव शुक्रवार दि. ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवस चालणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील  आश्रम शाळांतील तब्बल १०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.

 

 

 

या महोत्सवाचे उदघाटन शुक्रवारी (दि.३) रोजी दुपारी दीड वाजता रोटरीचे मनोनीत प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या हस्ते व श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान विवेकानंद ध्यान योग केंद्राचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठकानंद यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी अतिथी म्हणून मुक्त विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ राजाराम पाटील, रोटरी क्लबचे सचिव डॉ. गौरव सामनेरकर आणि रायला महोत्सवाचे चेअरमन डॉ. धनंजय माने उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रफुल बरडिया असतील.

 

 

 

तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सर्वश्री आनंद कोठारी, विक्रम बालाजीवाले, प्रांतपाल आनंद झुनझुनूवाला, अनीहृद्ध अथणी, हेमराज राजपूत, डॉ. अनिता नेहेते, डॉ. मदनुरकर, संतोष साबळे, दत्ता पाटील, सचिन शिंदे हे वक्ते निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांना ताऱ्यांचे बेट हा चित्रपट दाखविण्यात येणार असून नाट्य कार्यशाळा आणि सह्याद्री फार्मर्स कंपनीची भेट घडवून आणण्यात येणार आहे. याशिवाय बुद्धीप्रेरक खेळ, कॅम्प फायर, झुम्बाही घेण्यात येणार आहे. या रायला महोत्सवाचा समारोप रविवारी दुपारी १ वाजता आदिवासी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago