ऋतुजा लटके यांना दिलासा

राजीनामा स्वीकारण्याचे मनपाला निर्देश
मुंबई : प्रतिनिधी
हायकोर्टाने अखेर ऋतुजा लटके यांना दिलासा दिला आहे. त्यांचा राजीनामा उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत स्वीकारून तो मंजूर करावा, असे निर्देश कोर्टाने दिले. राजीनामा मंजूर होत नसल्याने लटके यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. हा राजीनामा स्वीकारण्यात यावा, असे कोर्टाने पालिकेला बजावले. यानिर्णयाने ठाकरे गटालाही दिलासा मिळाला असून, आता त्या आज ठाकरे गटाकडून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. लटके या ठाकरे गटाकडून उमेदवारी करणार असल्याने त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये म्हणून महापालिकेच्या प्रशासनावर मोठा दबाव होता, असा आरोप अनिल परब यांनीही केला होता. आपला राजीनामा मंजूर व्हावा म्हणून लटके यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. याचिका सुनावणीला आली असताना महापालिकेने लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना राजीनामा लवकर मंजूर करावा, अशी मागणी करण्याचा अधिकारच नाही, असा युक्तिवाद महापालिकेने केला. यावर न्यायालयाने भ्रष्टाचाराची तक्रार कधी केली? असा सवाल केला. त्यावर महापालिकेच्या वकिलाने कालच तक्रार दाखल झाल्याचे सांगितले. मात्र, न्यायालयाने हा मुददा नाकारत लटके यांचा राजीनामा मंजूर करावा, असे निर्देश मनपाला दिले. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठाच दिलासा मिळाला आहे. लटके यांची उमेदवारी होऊ नये म्हणून सत्ताधार्‍यांनी मोठे प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने लटके यांच्या बाजूने निकाल देत सत्ताधार्‍यांचे मनसुबे उधळून लावले.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

10 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago