आखाडा परिषदेचे सागरानंद सरस्वती यांचे देहावसान

आखाडा परिषदेचे सागरानंद सरस्वती यांचे देहावसान

त्र्यंबकेश्‍वर: आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष सगरानंद सरस्वती यांचे आज देहावसान झाले, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती, अन्न पाण्याचा त्याग केला होता.

श्री महंत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास ब्रम्हलिन झाले. त्यांनी वयाची शंभरी पार केली होती. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा १९६८,१९८०,१९९२ ,२००३ व २०१५ असे पाच कुंभमेळा त्यांच्या मार्गदर्शनाने संपन झाले.

अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषद अध्यक्ष होते. अत्यंत मनमिळावू शांत संयमी साधू म्हणून ते सर्वदूर परिचित होते.प्रत्येक कुंभमेळ्यात त्यांनी शासन अधिकारी आणि साधू यांच्यात समन्वय साधला.

आयुर्वेदाचा त्यांचा गाढा अभ्यास होता.लाखो रुग्णावर त्यांनी निःशुल्क उपचार केले.त्यांचे हजारो शिष्य आहेत.प्रापंचिक साधकांनी त्यांची गुरुदिक्षा घेतली आहे.गुरुपौर्णिमा असेल तेव्हा त्यांच्या गणपतबारी आश्रमात यात्रेचे स्वरूप येत असायचे.

आज सायंकाळी चार वाजता रींगरोड येथील आनंद आखडा गजलक्ष्मी मंदिर येथे दुपारी चार वाजता समाधी देणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *