नाशिक शहर

आखाडा परिषदेचे सागरानंद सरस्वती यांचे देहावसान

आखाडा परिषदेचे सागरानंद सरस्वती यांचे देहावसान

त्र्यंबकेश्‍वर: आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष सगरानंद सरस्वती यांचे आज देहावसान झाले, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती, अन्न पाण्याचा त्याग केला होता.

श्री महंत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास ब्रम्हलिन झाले. त्यांनी वयाची शंभरी पार केली होती. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा १९६८,१९८०,१९९२ ,२००३ व २०१५ असे पाच कुंभमेळा त्यांच्या मार्गदर्शनाने संपन झाले.

अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषद अध्यक्ष होते. अत्यंत मनमिळावू शांत संयमी साधू म्हणून ते सर्वदूर परिचित होते.प्रत्येक कुंभमेळ्यात त्यांनी शासन अधिकारी आणि साधू यांच्यात समन्वय साधला.

आयुर्वेदाचा त्यांचा गाढा अभ्यास होता.लाखो रुग्णावर त्यांनी निःशुल्क उपचार केले.त्यांचे हजारो शिष्य आहेत.प्रापंचिक साधकांनी त्यांची गुरुदिक्षा घेतली आहे.गुरुपौर्णिमा असेल तेव्हा त्यांच्या गणपतबारी आश्रमात यात्रेचे स्वरूप येत असायचे.

आज सायंकाळी चार वाजता रींगरोड येथील आनंद आखडा गजलक्ष्मी मंदिर येथे दुपारी चार वाजता समाधी देणार आहेत.

Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

13 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

13 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

14 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

14 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

14 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

14 hours ago