सविता दिवटे-चव्हाण
उन्हाळ्यातल्या तप्त उन्हाने पृथ्वीला तडे पडतात. संपूर्ण सृष्टी तहानलेली होऊन जाते…आणि एखादं दिवशी अचानक पृथ्वीचा सखा वरुणराजाचे आगमन होते. पावसाच्या येण्याने सृष्टीचे रूप पालटते.
वातावरणात नवचैतन्य पसरते.
वृक्षवेली बहरतात. डोंगर पावसाने न्हाऊन निघतात. नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागतात. चिंब चिंब पावसात पशू-पक्षीही भिजतात. सर्वत्र हिरवाई पसरू लागते.धरणीमाता तृप्त होऊन हिरवा शालू पांघरते.
पाऊस पृथ्वीचा खरा सखा…तो येतो अनेक सुखद गोष्टी घेऊन. आकाशात इंद्रधनुष्याचे प्रागट्य होते. मनाला मोहून जाते. रिमझिम पाऊस गारवा देतो तण आणि मनालाही. निसर्ग नव्या रूपात पाहायला मिळतो. खळखळणारे निर्झर आणि धबधबे साद घालतात. डोंगर हिरवाईने नटतात. सृष्टी ताजीतवानी होते.
मुख्य म्हणजे बळीराजा सुखावतो.शेतीच्या कामांची लगबग सुरू होते.सर्जा-राजाला सोबतीला घेऊन तो आनंदाने कामाला लागतो. पावसावर खरं तर त्याचे स्वप्न आकार घेत असते. मनात एक नवी उमेद घेऊन तो उभा राहतो.
पावसाच्या थेंबात अमृत भरलेले असते. तो थेब शिंपल्यात जाऊन मोती बनतो. शेतात जाऊन सोन्यासारखी पिकं उभी करतो. पशुपक्षी, वृक्षवेली, गुरेढोरे, मनुष्यप्राणी आणि निसर्गाला नवसंजीवनी बहाल करतो…मनाला आठवणीच्या राज्यात घेऊन जातो. म्हणूनच आपण सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहतो..तो पृथ्वीचा खरा सखा..तो पाठीराखा…
मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…
नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…
श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…